Sunday, September 6, 2026
Homeभंडारानजरे समोरच वीज कोसळल्याने डोळे मिटले; क्षणात डोळ्यासमोर अंधार दाटला अन् दृष्टीच...

नजरे समोरच वीज कोसळल्याने डोळे मिटले; क्षणात डोळ्यासमोर अंधार दाटला अन् दृष्टीच गमावली..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-विदर्भातील काही जिल्ह्यात शुक्रवार ८ ऑगस्ट आणि काल,शनिवार ९ ऑगस्ट रोजी विविध भागात मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस बरसला. पाऊस बरसला खरी,पण बऱ्याच ठिकाणी अचानकपणे विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावल्याने शेतावर वा इतर ठिकाणी कामांसाठी गेलेल्या नागरिकांची काहीकाळ तारांबळ उडाली होती.अश्यातच भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यात विजेमुळे एका महिलेस दृष्टी गमवावी लागल्याची घटना उघडकीस आली आहे.शेतात काम करत असतांनाच महिलेच्या समोरच वीज कोसळल्याने तिने डोळे मिटले.डोळे उघडुन बघताच तिच्या डोळ्यासमोर अंधार दाटला आणि क्षणात होत्याचे नव्हते झाले.सदरची घटना भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील खैरलांजी गावच्या शेतशिवारात काल शनिवारी घडली.यात खैरलांजी येथील ४८ वर्षीय प्रमिला मुकेश पुसाम या महिलेने विजेच्या कडाक्याने दृष्टी गमवावी लागली आहे.प्रमिला पुसाम या घरी असलेल्या गुरांना चारा आणण्यासाठी शेतावर गेल्या होत्या.चारा कापत असतांनाच दुपारच्या सुमारास अचानकपणे पावसाने हजेरी लावली.पाऊस बरसत असतांनाच प्रमिला यांच्या नजरे समोरच धाडकन वीज कडाडली.त्यामुळे घाबरलेल्या प्रमिला यांनी डोळे मिटले व नंतर डोळे उघडुन बघताच क्षणात दिसेनासे झाले आणि डोळ्यापुढे अंधार दाटला.लागलीच प्रमिला यांनी आरडाओरड केली.ओरडण्याचा आवाज ऐकून नागरिकांनी धाव घेतली आणि लगेच तिला तुमसरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.सध्या स्थितीत प्रमिला यांचेवर रुग्णालयात उपचार सुरू असून विजेमुळे क्षणात दृष्टी गमावण्याची वेळ आल्याने कुटुंबियांना मोठा हादरा बसला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नागपुरातील ऐतिहासिक ‘मारबत महोत्सव’ आजपासून सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरच्या सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य घटक असलेला ऐतिहासिक 'मारबत महोत्सव' आज,रविवार ६ सप्टेंबरपासून सुरू झाला.या वर्षीचा महोत्सव हा १४५...

‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद-२०२७’.. गडचिरोली जिल्ह्यातील युवकांना पंतप्रधानांसमोर नेतृत्वगुण,नवकल्पना मांडण्याची संधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याच्या संकल्पनेत युवाशक्तीचा सक्रिय सहभाग वाढविण्यासाठी ‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद -२०२७’ या राष्ट्रीय उपक्रमाला ‘विकसित...

पोलीस अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून एएसआयची आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  नवी मुंबई :-काही दिवसांपासून राज्यातील महाराष्ट्र पोलीस प्रशासनात खळबळ उडवून देणाऱ्या घटना उघडकीस येऊ लागल्या आहेत.मागील महिन्याच्या १६ ऑगस्टला नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयातील...

आता कांद्यानेही आणले सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी..

उद्रेक न्युज वृत्त :-बऱ्याच दिवसांपासून पांढऱ्या कांद्यानी सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणलेले असतांनाच आता लाल कांद्यानेही भाव खाऊन  सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे.हल्ली विविध शहरांच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!