उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली) :-देसाईगंज आदर्श इंग्लिश हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा नुकताच संपन्न झाला आहे.
महाविद्यालयातील फेब्रुवारी/मार्च २०२४ बोर्डाच्या परीक्षेत दहावी,बारावीत गुणवंत प्राप्त विद्यार्थांचे तसेच वयक्तिक विषयांमध्ये विशेष प्रावीण्य मिळविलेल्या विद्यार्थांचे नूतन शिक्षण प्रसारक मंडळ देसाईगंज येथील पदाधिकाऱ्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांसह त्यांचे पालकांचे शाल,श्रीफळ,सन्मानचिन्ह आणि रोख पारितोषिक देवून सत्कार करण्यात आला आहे.महाविद्यालयीन जीवनात प्रत्येक विद्यार्थ्यांनी अभ्यासाची कास धरून विशेष प्रावीण्य मिळविले पाहिजे.’यावे ज्ञानासाठी व निघावे सेवेसाठी’ असे प्रतिपादन समारंभ प्रकरणी आमदार कृष्णा गजबे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
सत्कार समारंभी प्रमुख पाहुणे म्हणून कार्यक्रमाचे उद्घाटक आमदार कृष्णा गजबे,कार्यक्रमाचे अध्यक्ष मोतिलाल कुकरेजा (सचिव नू.शि.प्र.मंडळ देसाईगंज) प्रमुख मार्गदर्शक तथा विशेष अतिथी मंगेश आरेवार (बिडीओ आरमोरी),प्रा.श्रीराम गहाणे (आ.क.वा.व वि.महा.देसाईगंज) तसेच जगदीश शर्मा(उपाध्यक्ष नू. शि.प्र.मंडळ देसाईगंज) मुरलीधरजी दुपारे(कोषाध्यक्ष नू.शि.प्र.मं.देसाईगंज), ओमप्रकाश अग्रवाल (सहसचिव नू.शि.प्र.मंडळ देसाईगंज),साधना सपाटे, अ.जाहिर अ.हमिद शेख,संतुमल डोडाणी,डॉ. इंदरप्रितसिंग टुटेजा,योगेश नाकतोडे, सोनल डी.घोरमोडे(सदस्य नू.शि.प्र.मंडळ देसाईगंज), जयदेव देशमुख (कार्य.प्राचार्य आ.क.वा.व वि.महा. देसाईगंज), शंकर कुकरेजा(माजी प्राचार्य आ.क.वा.व वि.महा. देसाईगंज), मुख्याध्यापक प्रा.डी.डी. शिंगाडे, उपमुख्याध्यापिका एस.पी.प्रधान, पर्यवेक्षिका डी.व्ही. चव्हाण, श्री.आर.बी.गायकवाड (गुणवंत विद्यार्थी सत्कार समिती आ.इं.हाय.तथा क.महा),हरीभाऊ पत्रे (उपाध्यक्ष शिक्षक पालक संघ) सुकेशिनी उके (सहसचिव शिक्षक पालक संघ) तसेच हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, शिक्षकवृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी,हायस्कूल तथा कनिष्ठ महविद्यालचे माझी सेवानिवृत शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यालयाचे विद्यार्थी सत्कार सामरंभला उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.पंकज धोटे आणि कु. माधुरी नाकाडे,कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रा.डी.डी. शिंगाडे, प्रमुख मार्गदर्शन मंगेश आरेवार व प्रा.श्रीराम गहाणे,अध्यक्षीय मार्गदर्शन मोतिलाल कुकरेजा यांनी केले तर आभार रेशिम गायकवाड़ यांनी मानले. कार्यक्रमची सांगता राष्ट्रवंदन घेऊन करण्यात आले.

