Tuesday, May 26, 2026
Homeचंद्रपूरतेंदूहंगाम संकटात; आज सकाळी वाघाच्या हल्ल्यात ३० वर्षीय महिला ठार.. - तीन...

तेंदूहंगाम संकटात; आज सकाळी वाघाच्या हल्ल्यात ३० वर्षीय महिला ठार.. – तीन दिवसांत पाचवा बळी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-जिल्ह्यात गोर-गरीब,सर्वसामान्य नागरिकांच्या रोजगाराचे साधन असलेल्या तेंदूहंगामावर वन्य प्राण्यांचे सावट आले असल्याचे दिसून येत आहे.आजच्या घटनेने वाघाच्या हल्ल्यात अवघ्या तीनच दिवसात पाचवा बळी गेला आहे. शनिवार १० मे रोजी सिंदेवाही तालुक्यातील मेंढा माल येथे तेंदू पाने तोडण्यासाठी जंगलात गेलेल्या शुभांगी मनोज चौधरी,कांता बुधा चौधरी,रेखा शालिक शेंडे या महिलांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता.तर काल,रविवारी ११ मे रोजी सकाळच्या सुमारास मूल तालुक्यातील चिचपल्ली वनपरीक्षेत्रातील नागाळा बिटात ६५ वर्षीय विमल बुधाजी शेंडे रा.नागाळा, ता.मूल हिच्यावर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना ताजी असतांनाच परत आज,सोमवार १२ मे रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास मूल तालुक्यातील भादुर्णा बिटातील कक्ष क्रमांक- ७९३ मध्ये ३० वर्षीय भूमिका दिपक भेंडारे,रा.भादुर्णा, ता.मूल,जि.चंद्रपूर हिच्यावर जंगलात तेंदूपाने तोडत असतांना वाघाने हल्ला करून ठार केले आहे.आजच्या घटनेनुसार तीन दिवसांत पाच महिला वाघाच्या हल्ल्याचे बळी ठरल्या आहेत.
मूल तालुक्यातील भादुर्णा येथील भाऊजी गावतुरे यांची मुलगी भूमिका हिचा विवाह केवाडा (पेठ) येथील दिपक भेंडारे सोबत झाला होता.काही वर्ष सासरी राहीली. त्यानंतर ती वडीलांकडे भादुर्णा येथे राहायला गेली होती.येथेच स्वतःच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी पती-पत्नी मिळेल ते काम करीत होते.अश्यातच आज सोमवारी सकाळच्या सुमारास भादुर्णा जंगलात भूमिका व तिचे कुटुंबीय तेंदूपाने तोडण्यासाठी गेले होते.जंगलात तेंदूपाने तोडत असतांनाच जंगल परिसरात दबा धरून बसलेल्या वाघाने भूमिका हिच्यावर अचानकपणे हल्ला केला. हल्ल्यात ती जागीच ठार झाली.वाघाने हल्ला केला तेव्हा काही अंतरावर असलेल्या आई,वडील आणि पतीने आरडाओरड करून तिचा जीव वाचविण्याचा प्रयत्न केला.परंतु,ती जागीच गतप्राण झाली होती.घटनेनंतर मृतदेह उचलण्यास महिलेच्या कुटुंबीयांनी नकार दिला. त्यामुळे काहीकाळ घटनास्थळी तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली होती.त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन मृतक महिलेच्या कुटुंबीयांची व नागरिकांनी समजून काढल्याने मृतदेह उचलण्यात आला.मुल आणि सिंदेवाही तालुक्यात तीन दिवसांमध्ये पाच जणांचा बळी गेल्याने वाघाची प्रचंड दहशत पसरली असल्याने वाघाचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अखेर बदल्यांचे सुलतान तुकाराम मुंढेनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाचा स्वीकारला पदभार..

उद्रेक न्युज वृत्त मुंबई :-बदल्यांचे सुलतान म्हणवल्या जाणारे आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी आज,सोमवार २५ मे रोजी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला.विशेष...

गडचिरोली जिल्ह्यात पुढील दोन दिवस उष्ण लहरींचा इशारा; आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-हवामान विभाग,प्रादेशिक केंद्र नागपूर यांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार गडचिरोली जिल्ह्यात  काही ठिकाणी उष्ण लहर ते तीव्र उष्ण लहर निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात...

हृदय हेलावणारी घटना..! आधी चार मुलांना विहरीत ढकलले व नंतर वडिलाने स्वतःही केली आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  बुलढाणा :-जिल्ह्याच्या जळगाव जामोद तालुक्यात हृदय हेलावणारी घटना आज,सोमवार २५ मे रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आल्याने समाजमन सुन्न झाले आहे.सातपुडा पर्वत रांगांच्या...

बलात्कार पीडितेचे नाव सार्वजनिक करणे पडले महागात.. – गृह विभागाचे प्रधान सचिव,पोलिस आयुक्त तसेच पोलिस निरीक्षक यांना उत्तर सादर करण्याचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बलात्कार पीडितेची किंवा लैंगिक अत्याचार प्रकरणातील अल्पवयीन पीडित मुलीची ओळख म्हणजेच नाव किंवा छायाचित्र जाहीर करणे कायद्यानुसार गंभीर गुन्हा आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!