उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :- मोहाडी तालुक्यात तलाठी लाच घेताना
एसीबीच्या जाळ्यात अडकला आहे.वैनगंगा नदीतून अवैधपणे वाळू उपसा केली जाते.अशा प्रकारे वाळू उपसा केल्यानंतर कारवाई न करण्यासाठी २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत विभागाच्या पथकाने तलाठ्याला ताब्यात घेतले आहे.
भंडारा जिल्ह्यातून वाहणाऱ्या वैनगंगा नदीची वाळू दर्जेदार आहे.या वाळूला विदर्भात मोठी मागणी आहे. त्यासाठी वाट्टेल तेथे वाळू चोरटे वाळूचा उपसा करतात.अशाच प्रकारे ट्रॅक्टरमध्ये वाळू भरून जात असताना तलाठी वैभव जाधव याला दिसले.त्यांनी ट्रॅक्टर थांबवून ट्रॅक्टर जप्त करतो; नाही तर २५ हजार रूपये मला दे अशी मागणी केली.पण मालकाकडे पैसे आज नाही,उद्या २० हजार रूपये देतो असे ट्रॅक्टर चालकाने सांगितले.
पण ट्रॅक्टर मालकाची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यानी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.सापळा रचून आरोपी तलाठी याला लाचेची रक्कम देण्यात येत असल्याने तलाठी याला संशय आल्याने त्यांनी लाच स्वीकारली नाही.त्यामुळे आरोपी वैभव जाधव याला ताब्यात घेत मोहाडी पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला.

