Monday, September 7, 2026
Homeदेसाईगंजआरमोरी विधानसभा क्षेत्रात 'चहापेक्षा केटली झाली गरम..!' -मतदारसंघातील चित्राबाबत विश्लेषकांनी बोलणे टाळले..

आरमोरी विधानसभा क्षेत्रात ‘चहापेक्षा केटली झाली गरम..!’ -मतदारसंघातील चित्राबाबत विश्लेषकांनी बोलणे टाळले..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-राज्यात विधासाभा निवडणुकांचे बिगुल वाजले जरी असले तरी जागावाटपाचा तिढा अजूनही कायमच आहे.येत्या २० नोव्हेंबर रोजी राज्यात एकाच टप्प्यात मतदान होणार आहेत.अशातच ‘चहापेक्षा केटली गरम झाली’ असल्याचा प्रत्यय सध्या गडचिरोली जिल्ह्याच्या आरमोरी विधानसभा क्षेत्रात दिसून येत आहे.विधानसभा निवडणूक जाहीर होताच उमेदवारांचे समर्थक आणि विरोधक हे सोशल माध्यमांवर सक्रिय झाले आहेत. सकाळी,दुपारी आणि रात्री समर्थकांकडून एखादी पोस्ट व्हॉटस्ॲपवर टाकली जाते आणि नंतर स्पर्धक उमेदवाराचे समर्थक सुध्दा त्यावर तिखट प्रतिक्रिया देतात.कुणी पाच तर कुणी वीस वर्षांचा हिशोब मागतो.त्यामुळे उमेदवारांचे समर्थक आणि विरोधकांमध्ये यावरून सोशल मीडियावर जोरदार वॉर सुरु असल्याचे चित्र आहे.
बरेचदा निवडणूक आचारसंहितेचा भंग सुद्धा होतो पण याकडे यंत्रणेचे फारसे लक्ष नसते.त्यामुळे उमेदवारांचे समर्थक आणि विरोधक याचा पुरेपूर फायदा घेत आहेत.गडचिरोली जिल्ह्यातील एकूण तीन विधानसभा मतदारसंघापैकी आरमोरी मतदारसंघातील निवडणुकीकडे संपूर्ण जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे.यात आरमोरी मतदारसंघात चूरस पूर्ण निवडणूक होण्याची शक्यता आहे.तर शेवटपर्यंत या मतदारसंघात काय चित्र असेल यावर विश्लेषकांनी सध्या बोलणे टाळले आहे.निवडणुका म्हटले की,आरोप प्रत्यारोप आलेच यात काही नवीन नाही.सोशल माध्यमांवर टाकल्या जाणाऱ्या पोस्ट आणि त्यावर होणाऱ्या वादाकडे उमेदवार पूर्णपणे दुर्लक्ष करीत आहेत.यावर कसलीही प्रतिक्रिया देणे टाळत आहेत.ते योग्य देखील आहे. मात्र,सध्या उमेदवारांचे समर्थक आपल्याच उमेदवारांना तिकीट झाल्याचे भासवित असल्याने तशी जोरदार पोस्टर बाजी सध्या सोशल मीडियावर सुरू झाली आहे.काहींच्या मते,पुरे झाल्या संधी. जनतेंनी अनेकांना संधी दिल्यात,आता नव्यांना संधी देणे आवश्यक आहे.महत्वाचे म्हणजे,ज्यांच्याकडे सर्वात जास्त सेना तयार झाली आहे; अशांनाच उमेदवारी मिळावी; असा जनतेचा कौल दिसून येतो आहे.अन्यथा बाजी मारणारे ‘तेच’ असा सूर उमटू लागला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

माजी सरपंचांनाच प्रशासक म्हणून कायम ठेवण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील सुमारे १४ हजार २३४ ग्रामपंचायतींवर तत्कालीन सरपंच हे प्रशासक म्हणून नेमण्यात आले होते.अश्यातच माजी सरपंचांच्या सहा महिन्यांच्या काही प्रशासक पदाची...

नागपुरातील ऐतिहासिक ‘मारबत महोत्सव’ आजपासून सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरच्या सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य घटक असलेला ऐतिहासिक 'मारबत महोत्सव' आज,रविवार ६ सप्टेंबरपासून सुरू झाला.या वर्षीचा महोत्सव हा १४५...

‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद-२०२७’.. गडचिरोली जिल्ह्यातील युवकांना पंतप्रधानांसमोर नेतृत्वगुण,नवकल्पना मांडण्याची संधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याच्या संकल्पनेत युवाशक्तीचा सक्रिय सहभाग वाढविण्यासाठी ‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद -२०२७’ या राष्ट्रीय उपक्रमाला ‘विकसित...

पोलीस अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून एएसआयची आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  नवी मुंबई :-काही दिवसांपासून राज्यातील महाराष्ट्र पोलीस प्रशासनात खळबळ उडवून देणाऱ्या घटना उघडकीस येऊ लागल्या आहेत.मागील महिन्याच्या १६ ऑगस्टला नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयातील...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!