Wednesday, April 15, 2026
Homeदेसाईगंजआंबेडकरी समाजाची दिशाभुल करणे आता अशक्य... -वंचित बहुजन आघाडीचे राजरतन मेश्राम

आंबेडकरी समाजाची दिशाभुल करणे आता अशक्य… -वंचित बहुजन आघाडीचे राजरतन मेश्राम

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-लोकसभा निवडणुकीत भाजप व कॉंग्रेस या दोन्ही पक्षांनी संविधान बदल हा विषय समोर ठेवुन आंबेडकरी समाजाची दिशाभुल केली.पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांची १० वर्षाची हुकुमशाहीच्या वाटचालीला लगाम लावण्यासाठी तमाम आंबेडकरी समुदायाने चळवळीची विचारधारा बाजुला ठेवुन कॉंग्रेस प्रणित महाविकास आघाडी ला सरसकट मतदान केले.मात्र,लोकसभा निवडणूक नंतर कॉंग्रेस चा दांभिकपणा समोर आल्याने,आता या समाजाची दिशाभुल करणे अशक्य असल्याचे मत वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव तथा आरमोरी विधानसभा प्रमुख राजरतन मेश्राम यांनी व्यक्त केले आहे.
लोकसभा निवडणुकीत आंबेडकरी विचारधारेच्या प्रतिनिधिंना लोकसभेत पोहचु द्यायचे नाही; यासाठी भाजप व कॉंग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी परस्पर हातमिळवणी करुण आंबेडकरी समुदायाची दिशाभुल करण्याचे कट कारस्थान रचले.भाजपचे राज्यसभा खासदार अनंतकुमार हेगडे यांनी संविधान बदलण्याचे वक्तव्य केलेली चित्रफित व्हायरल करुन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले भारतिय संविधान  पंतप्रधान नरेन्द्र मोदी पुन्हा सत्तेत आल्यास बदलले जाईल,या भितीमुळे तमाम आंबेडकरी समाजाने चळवळीचा विचार बाजुला ठेवुन सरसकट कॉंग्रेस प्रणित महाविकास आघाडी ला मतदान केले.यामुळे पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्या हुकुमशाही प्रणित धोरणांवर लगाम लावण्यास नक्किच मदत झाली. पण लोकसभा निवडणुकीनंतर कॉंग्रेस पक्षाचा दांभिकपणा मात्र उघड झाला.बार्टी च्या माध्यमातुन एस सी,एस टी समुहाच्या विद्यार्थ्यांच्या हक्काचा शैक्षणिक निधी कमी करण्यात आला.विरोधी पक्ष म्हणून कॉंग्रेसने कोणतीही भुमिका बजावली नाही. लगतच असलेल्या कर्णाटक राज्य सरकारने एससी, एसटी विद्यार्थ्यांचा रिजर्व्ह असलेला ३५ हजार कोटी रुपयांचा शैक्षणिक निधी इतरत्र वळती केला. याठिकाणी कॉंग्रेस ची सत्ता आहे.सर्वात महत्वाचे म्हणजे १ ऑगस्टला एससी,एसटी समुहाचे वर्गिकरण करुण क्रिमिलेयर ची अट लागु करण्याचा असंवैधानिक निकाल जाहिर केला.त्याची प्रथम अंमलबजावणी कॉंग्रेसची सत्ता असलेल्या तेलंगाना व कर्णाटक सरकारने केली.यावरून कॉंग्रेस पक्ष हा आंबेडकरी समाजासह आदिवासी समाजाची दिशाभुल करत असल्याचे सत्य आता समाज खऱ्या अर्थाने ओळखु लागला आहे.कॉंग्रेस पक्षात राहुन काहितरी साध्य करता येईल,या लालसेने काही आंबेडकरी समाजाचे कार्यकर्ते समाजाची दिशाभुल करण्याचा प्रयत्न करत असले तरी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना संसदेत कधिच पोहचु न देणारा,त्यांना वेळोवेळी त्रास देवुन अपमान करणारा व भारतरत्न या सन्मानापासुन वंचित ठेवणारा कॉंग्रेसचा खरा चेहरा आंबेडकरी समाज ओळखत असुन,यापुढे या समाजाची दिशाभुल करणे अशक्य आहे.वंचित बहुजन आघाडीचे प्रणेते ॲड.बाळासाहेब आंबेडकर संपुर्ण महाराष्ट्रात एससी,एसटी व ओबिसी समुहांची मोट बांधणी करीत असुन महाराष्ट्रात येत्या काळात सत्ता परिवर्तन होऊ शकते; आंबेडकरी समाजाने पराभुत मानसिकता बाळगून कॉंग्रेसचे हस्तक असलेल्या लोकांपासुन सावध राहावे; असे आवाहन  राजरतन मेश्राम यांनी केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उष्णतेची लाट; उद्याला ‘या’ जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी,प्राथमिक व माध्यमिक शाळा राहणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-राज्याच्या विविध भागात उन्हाची तीव्रता वाढली आहे.भारतीय हवामान विभागाने आज,बुधवार १५ एप्रिल रोजी वर्धा जिल्ह्यास उष्णतेचा 'यलो अलर्ट' जाहीर केला होता.अश्यातच...

उद्याला सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल गडचिरोलीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे वित्त,नियोजन,कृषी,मदत व पुनर्वसन,विधी व न्याय,कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल हे उद्या,गुरुवार १६ एप्रिल रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत...

बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकली ठार; आजची घटना..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील परिसरात वाघिणीने धुमाकूळ घालून गुरुवार,१९ मार्च २०२६ रोजी बाम्पेवाडा येथील ५० वर्षीय वसंत गणपत मेश्राम यांचा जीव घेतला...

आता प्रत्येक लाभार्थी कुटुंबास मिळणार तीन लिटर रॉकेल..

उद्रेक न्युज वृत्त :-जमाना कितीही बदलला तरीही 'जुनं ते सोनं' अशी अवस्था केवळ आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर झाल्याचे चित्र आहे. महाराष्ट्र राज्याच्या विविध...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!