- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-अपघातांची मालिका संपता-संपेना.राज्यातच नव्हे तर सर्वत्र मोठ्या प्रमाणावर अपघातांचे प्रमाण वाढलेले दिसून येतात.अश्यातच चंद्रपूर जिल्ह्याच्या राजुराहून बल्लारशाहकडे स्वतःच्या स्कूटी वाहनाने जात असतांना वाटेतच आई आणि तिच्या मुलीवर काळाने घाला घातल्याची घटना आज, सोमवार ९ जून रोजी दुपारच्या सुमारास उघडकीस आली.एका अज्ञात ट्रकने स्कूटीला जोरदार धडक दिल्याने स्कूटीवर स्वार असलेल्या माय-लेकिचा घटनास्थळीच मृत्यू झाला.ज्योती बंडू रागीट वय ४२ वर्षे व मुलगी सेजल बंडू रागीट रा.पेठ वार्ड-राजुरा, ता.राजुरा,जि.चंद्रपूर असे अपघातात ठार झालेल्या आई आणि मुलीचे नाव आहे.

माहितीनुसार,दोघीही मायलेकी आज स्कूटी क्रमांक- एमएच ३४ बीएन ५५३८ ने काही कामानिमित्त राजुराहून बल्लारशाहकडे जात होत्या.जात असतांनाच भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात ट्रकने राजुरा-बल्लारशाह मार्गावरील वर्धा नदीचा पुल ओलांडताच जलाराम बाप्पा मंदिराजवळ स्कूटीला जोरदार धडक दिली.यात दोघीही मायलेकी मुख्य मार्गावर कोसळून जागीच ठार झाल्या. धडक देऊन अज्ञात ट्रक चालक ट्रक घेऊन पसार झाला. सदरची घटना मार्गावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांनी पोलिसांना देताच पोलिसांनी घटनास्थळ गाठत मृतांचे शव उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात दाखल केले. घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.
- Advertisement -

