- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :-जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील खैरी/पट येथील शेतकऱ्यास वाघाने हल्ला चढवून ठार केल्याची घटना रविवार ३० मार्च रोजी घडली व ३१ मार्च रोजी सकाळच्या सुमारास सर्वत्र उघडकीस आली होती.खैरी/पट येथील ४० वर्षीय शेतकरी डाकराम गोपीचंद देशमुख हे त्यांच्या मालकी शेत शिवारातील शेतात रविवारी सायंकाळच्या सुमारास मोटार पंपाद्वारे पिकांना पाणी देण्यासाठी गेले होते.अशातच दबा धरुन बसलेल्या वाघाने अचानकपणे हल्ला करून ठार केले होते.त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते.वाघाने शेतकऱ्याचा बळी घेतल्यानंतर नागरिकांसह परिसरातील शेतकऱ्यांनी संताप व्यक्त करीत वाघाला तत्काळ जेरबंद करण्याची मागणी केली होती.अशातच टी-७५ नामक वाघिणीच्या २ वर्षीय शावकाने शेतकऱ्याचा बळी घेतल्याचे उघडकीस येताच वाघाला पकडण्यासाठी दोन दिवसांपासून वन विभागाचे पथक मागावर होते. त्यासाठी जंगलात गस्त वाढवून १५ ट्रॅप कॅमेरे, एका ड्रोन कॅमेऱ्यामधून निगराणी सुरू केली होती. ४ मचाण उभारून त्यावर ४ शार्प शूटर ठेवण्यात आले होते.आठ ठिकाणी पिंजरेही लावण्यात आले होते. दरम्यान,दोन दिवसांपूर्वी म्हणजेच बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास मक्याच्या शेताजवळ लावलेल्या पिंजऱ्यात बांधून ठेवलेली शिकार खाण्यासाठी वाघ आला.हे लक्षात येताच पाळतीवर असलेल्या शार्प शूटरने वाघाला डार्ट दिला.त्यानंतर वाघ जवळपास ५० मीटर अंतरावर जाऊन बेशुद्ध झाला.त्यानंतर वन विभागाच्या पथकाने त्याला पिंजऱ्यात कैद केले.मध्यरात्रीच्या सुमारास केलेल्या या कारवाईनंतर वेळ न दवडता,रात्रीच दोन पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात पिंजऱ्यात कैद करून वाघाला नागपूर येथील गोरेवाडा राष्ट्रीय व्याघ्र प्रकल्पात हलविण्यात आल्याने परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे.
- Advertisement -

