- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र सरकारने विविध योजनांचा धडका सुरू करीत अनेकांना पैश्याचे लालच देऊ केले आहे.अशातच राज्य शासनाने लाडकी बहीण योजना आणली.दीड कोटी महिलांना प्रत्येकी मासिक दीड हजार रुपये दिले जात आहेत.याचा राज्य शासनाच्या तिजोरीवर मोठा भार पडत आहे.महागाई गगनाला भिडली आहे.महागाईच्या या आगडोंबाने लाडक्या बहिणीत ‘कही खुशी-कही गम’ व्यक्त केला जात आहे.गृहिणींचे बजेट बिघडल्याने ‘मुख्यमंत्री महोदय योजनेचे पैसे बंद करा; पण महागाई नियंत्रणात आणा’ अशी म्हणण्याची वेळ या लाडक्या बहिणींवर येऊन ठेपली आहे.एकंदरीत राज्य शासनाचा हा आवळा देऊन भोपळा घेण्याचा प्रकार असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे देसाईगंज तालुकाध्यक्ष पवन खोब्रागडे यांनी केला आहे.
राज्य शासनाने दोन महिन्यांपासून लाडकी बहीण योजना सुरू केली.पण याचदरम्यान लाडक्या बहिणींच्या रोजच्या जेवणातील खाद्य तेलाचे भाव प्रचंड वाढले आहेत. लाडक्या बहिणींच्या घरचे पूर्ण बजेट बिघडले आहे. एकंदर लाडक्या बहिणींच्या खुशीसाठी लाडक्या दाजिच्या खिशाला भार पोहोचविण्याचे काम राज्य शासन करीत आहे; असा आरोप खोब्रागडे यांनी केला आहे.
- Advertisement -

