Monday, July 20, 2026
Homeचंद्रपूरकोळशी येथे ग्राम जयंती महोत्सव आदर्श विवाह मेळावा संपन्न

कोळशी येथे ग्राम जयंती महोत्सव आदर्श विवाह मेळावा संपन्न

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

नितेश केराम/चंद्रपूर विशेष जिल्हा प्रतिनिधी

चंद्रपूर :- कोरपना तालुक्यातील कोळशी येथे ग्राम जयंती महोत्सव आदर्श विवाह मेळावा दरवर्षी प्रमाणे याही वर्षी सुध्दा मोठ्या उत्साहात साजरा करून संपन्न झाला.कोळशी ग्रामवाशिय जनता अविरत पंधरा वर्षांपासून विवाह सोहळ्याची पंरपरा जोपासित आहेत.सदर विवाह सोहळ्यामध्ये कुठल्याही प्रकारची आर्थिक मदत न घेता संपूर्ण विवाह मोफत लावल्या जातो.

आजच्या घडीला अनेक विवाहांवर लाखो रुपयांची उधळपट्टी केली जाते.मात्र अनेक सर्वसामान्य व गोरगरीब नागरिकांकडे पैस्या अभावी विवाहास आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो.अशातच हीच परिस्थिती लक्षात घेता गावागावात सुख शांती प्रस्तापित होण्याच्या दुष्टीने सर्व थोर महापुरुष व संताच्या जयंतीचे औचित्य साधून वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या अंतीम इच्छेनुसार श्री गुरुदेव सेवा मंडळ सक्रिय कार्य घडविण्यासाठी तसेच नव्या पिडीला मानवधर्ममाचा विश्वशांतीचा व बंधुत्वाचा दिव्य संदेश देण्याचा साधूसंत व महापूरुषाचा कार्यकर्तुंत्वाचा जाणीव व्हावी व प्रेरणा मिळावी या निमित्ताने ग्राम जयंती महोत्सव आदर्श विवाह मेळावा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्या निमित्त कार्यक्रमात विवाह सोहळा ठेवण्यात आला.यामध्ये कोळशी गावातील युवक तरुण पुढे येऊन असे विविध कार्यक्रम गावात राबवित असतात.  विवाह सोहळ्यामध्ये परिसरातील गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने विवाह सोहळ्याचा कार्यक्रम मोठया संखेने पार पाडण्यात आला.

सदर मेळाव्यात तीन विवाह पार पडले असून विवाह सोहळ्याच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रेमललीत पारधी,ग्रामगीतार्चाय घुग्गुसचे नंदकीशोर वाढई,सरपंच संघटनेचे कालिदास चेडे,मीनाथ महाराज नारायण झाड,उमेश कोल्हे,दिलीप दोरखंडे,पांडुरंग जरीले, किलनाके महाराज आदींची प्रमुख्याने उपस्थिती होती. 

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कोणताही पात्र बांधकाम कामगार योजनांपासून वंचित राहू नये.. -प्रत्येक ग्रामपंचायत व पंचायत समिती स्तरावर विशेष जनजागृती मोहीम राबवा- आमदार रामदास मसराम

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ,मुंबई अंतर्गत जिल्हा कामगार सुविधा केंद्र,गडचिरोली यांच्या वतीने आज,सोमवार २० जुलै रोजी देसाईगंज पंचायत समिती...

तब्बल ११७ आपले सरकार सेवा केंद्रांसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात रद्द..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात ११५ ग्रामपंचायत व दोन नगरपरिषद/नगरपंचायत स्तरावरील एकूण ११७ आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करण्यासाठी १५ जून २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात...

सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ विद्यार्थी उतरले रत्यावर..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-देशातील सध्याचे चित्र काही खरे नाही. अनेकजण आपली जबाबदारी व चूक मान्य करण्यास तयारच नाहीत.तुम्ही काहीही करा,आम्हाला कसलाही फरक पडणार नाही....

कारला ट्रकची ठोसर; भीषण अपघातात सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर विरूळ परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात तब्बल सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.यात कारमधील एका कुटुंबातील चार सदस्य,ट्रकचा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!