Monday, September 7, 2026
Homeदेसाईगंजदेसाईगंजच्या शंकरपुर परिसरात सर्वात जास्त पावसाची नोंद; तर २० महसुल मंडळात मुसळधार...

देसाईगंजच्या शंकरपुर परिसरात सर्वात जास्त पावसाची नोंद; तर २० महसुल मंडळात मुसळधार पाऊस..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या विविध तालुक्यात काल मंगळवारपासून ते आज बुधवार सकाळपर्यंत दमदार पावसाने हजेरी लावली.अजूनही पाऊस सुरूच आहे.२४ तासात जिल्ह्यात सरासरी ५१.४ मिमी पावसाची नोंद झाली आहे.तर २० महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली असून एकट्या देसाईगंज तालुक्यात ९३ मिमी पाऊस कोसळला.त्यातच, जिल्ह्यातून सर्वात जास्त पावसाची नोंद ही देसाईगंज तालुक्याच्या शंकरपुर परिसरात झाली असून शंकरपुर महसूल मंडळात ११५ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.त्याचबरोबर,जिल्ह्यातील बारा तालुक्यापैकी सरासरी कोसळलेल्या पावसाच्या नोंदीत देसाईगंज तालुका पहिल्या क्रमांकावर असून येथे ९३ मिमी पाऊस, धानोरा ८५ मिमी,आरमोरी ७७.८ मिमी,कुरखेडा ७१.१ मिमी, कोरची ६१.८ मिमी,गडचिरोली ५७.१ मिमी, एटापल्ली ४७.५ मिमी,चामोर्शी ३५.७ मिमी,मुलचेरा २५.३ मिमी,भामरागड २२.८ मिमी,अहेरी २१.४ मिमी तर सिरोंचा तालुक्यात १९.१ मिमी सरासरी पावसाची नोंद करण्यात आली आहे.
  • सर्वात जास्त पावसाची नोंद झालेली २० महसूल मंडळे👇
  •  शंकरपुर(ता.देसाईगंज)-११५
  •  धानोरा- ९७.०
  • कोरची –९१.६
  •  मुरुमगाव(ता.धानोरा)-९०.२
  •  कढोली (ता.कुरखेडा)-८२.६
  • मसेली (ता.कोरची)-८२.०
  • चातगाव(ता.धानोरा)-८०.२
  • वैरागड(ता.आरमोरी)-८०.०
  • पोटेगाव(ता.गडचिरोली)-७८.१
  • आरमोरी –७८.०
  • देऊळगाव(ता.आरमोरी)-७८.०
  • कोटगुल(ता.कोरची)- ७६.४
  • पिसेवडधा(ता.आरमोरी)-७५.०
  • बेळगाव(ता.कोरची)- ७३.४
  •  पेंढरी(ता.धानोरा)-७२.४
  • देसाईगंज- ७१.०
  • मालेवाडा(ता.कुरखेडा)-७०.३
  •  बाम्हणी(ता.गडचिरोली)-७०.०
  •  कुरखेडा –६६.३
  • पुराडा(ता.कुरखेडा)-६५.२
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नागपुरातील ऐतिहासिक ‘मारबत महोत्सव’ आजपासून सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरच्या सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य घटक असलेला ऐतिहासिक 'मारबत महोत्सव' आज,रविवार ६ सप्टेंबरपासून सुरू झाला.या वर्षीचा महोत्सव हा १४५...

‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद-२०२७’.. गडचिरोली जिल्ह्यातील युवकांना पंतप्रधानांसमोर नेतृत्वगुण,नवकल्पना मांडण्याची संधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याच्या संकल्पनेत युवाशक्तीचा सक्रिय सहभाग वाढविण्यासाठी ‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद -२०२७’ या राष्ट्रीय उपक्रमाला ‘विकसित...

पोलीस अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून एएसआयची आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  नवी मुंबई :-काही दिवसांपासून राज्यातील महाराष्ट्र पोलीस प्रशासनात खळबळ उडवून देणाऱ्या घटना उघडकीस येऊ लागल्या आहेत.मागील महिन्याच्या १६ ऑगस्टला नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयातील...

आता कांद्यानेही आणले सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी..

उद्रेक न्युज वृत्त :-बऱ्याच दिवसांपासून पांढऱ्या कांद्यानी सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणलेले असतांनाच आता लाल कांद्यानेही भाव खाऊन  सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे.हल्ली विविध शहरांच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!