Monday, July 13, 2026
Homeचंद्रपूरसामान्य माणसाचा जीव २५ लाखांचा ठरवत असाल तर तुम्ही स्वतः वाघासमोर उभे...

सामान्य माणसाचा जीव २५ लाखांचा ठरवत असाल तर तुम्ही स्वतः वाघासमोर उभे राहा; आम्हीही तुम्हाला २५ लाख देतो..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-नुकतेच चंद्रपूर जिल्ह्याच्या सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही परिसरात वाघाच्या हल्ल्यात चार महिलांचा मृत्यू झाला.या घटनेने सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे.या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्त्या तथा बालरोग तज्ज्ञ डॉ.अभिलाषा गावतुरे(बेहरे)यांनी गुंजेवाही गावात पोहचून मुख्य वनसंरक्षकांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांना उघड आव्हान देत,सामान्य माणसाचा जीव २५ लाखांचा ठरवत असाल,तर तुम्ही स्वतः वाघासमोर उभे राहा; आम्हीही तुम्हाला २५ लाख देतो, सर्वसामान्य नागरिकांचा जीव जातो,पण अधिकारी वातानुकूलित कार्यालयात बसून फक्त आर्थिक मदतीची घोषणा करतात.त्यांना या मृत्यूचे दुःख होत नाही.जर सामान्य माणसाच्या जीवाची किंमत २५ लाख असेल,तर अधिकाऱ्यांनीही स्वतःला त्या परिस्थितीत उभे करावे. वनविभाग मृतांच्या कुटुंबीयांना १५ लाख आणि १० लाख अशा टप्प्यांत मदत देतो.आम्ही मात्र थेट २५ लाखांचा चेक देण्यास तयार आहोत.पण,त्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वतः वाघाच्या जबड्यात जाण्याची तयारी दाखवावी,अश्या कडक शब्दांत वनविभागाच्या धोरणांवर हल्लाबोल केला.
गुंजेवाही येथील नागरिकांशी संवाद साधतांना डॉ. गावतुरे म्हणाल्या की,मानव-वन्यप्राणी संघर्षाच्या घटना अनेक वर्षापासून सुरू आहेत.कधी आईसमोरून लेकरू उचलले जाते,कधी काकाच्या मांडीवरून मुलाला वाघ घेऊन जातो,तर कधी शेतात काम करणाऱ्या महिलांचा बळी जातो.या घटना आता विदर्भातील ग्रामीण भागासाठी रोजचे वास्तव बनले आहे.यापूर्वीही या परिसरात तीन महिलांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता आणि आता पुन्हा चार महिलांना जीव गमवावा लागला.या महिला कोणाची तरी आई,पत्नी,बहीण होत्या. त्यांच्या मृत्यूनंतर वनविभाग २५ लाखांची मदत जाहीर करून आपली जबाबदारी संपल्यासारखे वागतो.पण,या घटना रोखण्यासाठी वनविभागाकडून ठोस उपाययोजना कां केल्या जात नाहीत? असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

यालाच म्हणतात खरे राजकारण..! स्थानिक आमदारांची चुप्पी; तर बाहेरच्या आमदारांना चिंता..

उद्रेक न्युज वृत्त  ब्रम्हपुरी(चंद्रपूर):-काही कालावधीपासून राज्याच्या विविध भागात अवैध रेती उत्खनन आणि रेती तस्करीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.रेतीतून मिळणारा बक्कळ पैसा अनेकांना करोडपती,तर काहींना रोडपती...

तब्बल ५४ किलो ९९८ ग्रॅम गांजा जप्त; दोन आरोपींना अटक..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-शांतीनगर पोलिस ठाणे हद्दीत नागपूर गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई करत तब्बल ५४ किलो ९९८ ग्रॅम गांजा जप्त करून दोन आरोपींच्या मुसक्या...

सिंदेवाहीत माकडांची दहशत कायम; दोन दिवसांत दोन जणांवर हल्ले,नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण..

उद्रेक न्युज वृत्त  प्रशांत गेडाम सिंदेवाही(चंद्रपूर):-सिंदेवाही शहरात माकडांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढतच चालला असून दोन दिवसांत दोन नागरिकांवर हल्ले झाल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.त्यामुळे वनविभागाने...

राज्यात ‘किलकारी’ उपक्रमात वर्धा पहिल्या,चंद्रपूर दुसऱ्या,वाशीम तिसऱ्या तर गडचिरोली चौथ्या स्थानावर..

उद्रेक न्युज वृत्त  ​गडचिरोली :-केंद्र शासनाच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयांतर्गत गरोदर माता,माता आणि बालकांच्या आरोग्याविषयी डिजिटल साक्षरता व जनजागृती करणाऱ्या ‘किलकारी’(Kilkari Mobile Audio Services)उपक्रमात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!