Thursday, August 27, 2026
Homeआरमोरीअनियंत्रित दुचाकी बसला जाऊन धडकली; दुचाकीस्वाराचा मृत्यू..

अनियंत्रित दुचाकी बसला जाऊन धडकली; दुचाकीस्वाराचा मृत्यू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
आरमोरी(गडचिरोली):-वळण मार्गावर अनियंत्रित झालेली दुचाकी बसला जाऊन धडकल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज, शुक्रवार २४ एप्रिल रोजी सायंकाळच्या सुमारास आरमोरी तालुक्याच्या वैरागड ते ठाणेगाव वळण मार्गावर घडली.कर्मवीर भूरसे वय ५० वर्षे, रा.ठाणेगाव, ता.आरमोरी,जि.गडचिरोली असे अपघातात मृत पावलेल्या इसमाचे नाव असून ते काही कामानिमित्त वैरागडला होते.दरम्यान,गावाकडे परत येत असतांनाच सदरचा अपघात घडला.
कर्मवीर भूरसे हे त्यांच्या दुचाकीने एकटेच वैरागडला गेले होते.तेथील कामे आटोपून सायंकाळच्या सुमारास दुचाकीने ठाणेगावला येण्यासाठी निघाले असता वैरागड ते ठाणेगाव वळण मार्गावर त्यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि त्याचवेळेस समोरून येणाऱ्या बसला दुचाकी जाऊन धडकली.यात कर्मवीर भूरसे हे मुख्य मार्गावरच कोसळल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागला.दरम्यान,मार्गावरून ये-जा करणाऱ्या प्रवाशांनी मदतकार्य सुरू केले,पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. अपघाताची माहिती आरमोरी पोलीस प्रशासनास देण्यात आली असून पुढील प्रक्रिया पार पाडणे सुरू होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नेपाळमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी संपर्क क्रमांक व ऑनलाइन नोंदणी लिंक जारी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.या पार्श्वभूमीवर नेपाळमध्ये अडकलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील पर्यटकांनी अथवा त्यांच्याशी संपर्क...

विजेचा जोरदार धक्का लागल्याने कर्मचाऱ्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-शेतशिवारातील विद्युत वाहिनीतील तांत्रिक बिघाड दूर करत असतांनाच अचानकपणे विजेचा जोरदार धक्का लागून विद्युत वितरण कंपनीत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू...

गडचिरोली जिल्ह्यातील सर्व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देश.. -कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही- सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोंसले

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील रस्ते व पुलांची कामे उच्च प्रतीची,सुरक्षित आणि दीर्घकाळ टिकणारी झाली पाहिजेत.कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही.निकृष्ट अथवा सदोष...

धक्कादायक..! आई-वडीलांनी दोन मुलांना सोबत घेऊन धावत्या रेल्वे समोर मारली उडी.. – चौघांचा करून अंत..

उद्रेक न्युज वृत्त  जळगाव :-जिल्ह्याच्या अमळनेर तालुक्यातील टाकरखेडा येथे आज,गुरुवार २७ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास एकाच कुटुंबातील चौघांनी धावत्या रेल्वे समोर उडी मारून सामूहिक आत्महत्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!