- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
आरमोरी(गडचिरोली):-वळण मार्गावर अनियंत्रित झालेली दुचाकी बसला जाऊन धडकल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज, शुक्रवार २४ एप्रिल रोजी सायंकाळच्या सुमारास आरमोरी तालुक्याच्या वैरागड ते ठाणेगाव वळण मार्गावर घडली.कर्मवीर भूरसे वय ५० वर्षे, रा.ठाणेगाव, ता.आरमोरी,जि.गडचिरोली असे अपघातात मृत पावलेल्या इसमाचे नाव असून ते काही कामानिमित्त वैरागडला होते.दरम्यान,गावाकडे परत येत असतांनाच सदरचा अपघात घडला.
कर्मवीर भूरसे हे त्यांच्या दुचाकीने एकटेच वैरागडला गेले होते.तेथील कामे आटोपून सायंकाळच्या सुमारास दुचाकीने ठाणेगावला येण्यासाठी निघाले असता वैरागड ते ठाणेगाव वळण मार्गावर त्यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि त्याचवेळेस समोरून येणाऱ्या बसला दुचाकी जाऊन धडकली.यात कर्मवीर भूरसे हे मुख्य मार्गावरच कोसळल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागला.दरम्यान,मार्गावरून ये-जा करणाऱ्या प्रवाशांनी मदतकार्य सुरू केले,पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. अपघाताची माहिती आरमोरी पोलीस प्रशासनास देण्यात आली असून पुढील प्रक्रिया पार पाडणे सुरू होते.
- Advertisement -

