- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
आरमोरी(गडचिरोली):-आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांच्या नेतृत्वाखाली आज, सोमवार ९ फेब्रुवारीला रेल्वे प्रकल्पाशी संबंधित शेतकऱ्यांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी आरमोरी तहसील कार्यालयात सविस्तर बैठक घेण्यात आली.रेल्वे प्रकल्पामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीचा योग्य तो वाढीव मोबदला मिळावा तसेच प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र तातडीने देण्यात यावे,ही प्रमुख मागणी या बैठकीत शेतकऱ्यांच्या वतीने मांडण्यात आली.प्रसंगी बैठकीदरम्यान शेतकऱ्यांनी मोबदला निश्चिती,जमिनीचे मोजमाप,कागदपत्रांची पूर्तता तसेच प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र मिळण्यास होणारा विलंब यासंदर्भातील अडचणी सविस्तरपणे मांडल्या.यावेळी आमदार मसराम यांनी विकास प्रकल्प राबवितांना शेतकऱ्यांचे हित सर्वोच्च असले पाहिजे,कोणत्याही शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही,याची दक्षता घेत योग्य मोबदला व प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र देऊन बाधित शेतकऱ्यांच्या समस्या तात्काळ मार्गी लावण्याचे निर्देश दिले.यावर देसाईगंजचे उपविभागीय अधिकारी प्रधान यांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक प्रतिसाद देत नियमांनुसार योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.तसेच आरमोरी तहसील कार्यालयाच्या तहसीलदार चौधरी यांनी प्रशासनामार्फत आवश्यक ती प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याची ग्वाही दिली.या बैठकीस महसूल विभागातील अधिकारी,कर्मचारी तसेच रेल्वे प्रकल्पग्रस्त शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.प्रसंगी आरमोरी काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष मिलिंद खोब्रागडे,धनपाल मिसार,जिल्हा काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष दिलीप घोडाम, कवडू शहारे आदी मान्यवर उपस्थित होते.
- Advertisement -

