Thursday, May 21, 2026
Homeआरमोरीरब्बी धान खरेदी केंद्रे तात्काळ सुरू करा- आमदार रामदास मसराम

रब्बी धान खरेदी केंद्रे तात्काळ सुरू करा- आमदार रामदास मसराम

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
आरमोरी(गडचिरोली):-परिसरात रब्बी हंगामातील धानाची कापणी झाली असल्याने मोठ्या प्रमाणात धान विक्री करीता बाजारात येण्यास सुरुवात झाली आहे.मात्र,शासनाकडून अद्यापही धान खरेदीसाठी आवश्यक गोदामांची व्यवस्था करण्यात आलेली नाही.तसेच अनेक ठिकाणी शासकीय धान खरेदी केंद्रे सुरू न झाल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
शासकीय खरेदी केंद्र बंद असल्याने शेतकरी हतबल आपले धान खुले बाजारात कमी दराने विकत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असून त्यांच्या मेहनतीला योग्य मोबदला मिळत नाही.ही परिस्थिती अत्यंत गंभीर असून प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे.यासंदर्भात आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांनी शासन व संबंधित प्रशासनाला मागणी करत लवकरात लवकर आवश्यक गोदामांची व्यवस्था करून शासकीय धान खरेदी केंद्रे सुरू करण्याची मागणी केली आहे.शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन तात्काळ निर्णय घेण्यात यावा,अन्यथा शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार असल्याचे त्यांनी सांगितले.तसेच धान खरेदी प्रक्रिया पारदर्शक व सुरळीतपणे राबवून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा,अशी मागणीही आमदार मसराम यांनी केली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून १४.४६ लाखांचा दंड वसूल..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात रस्ता सुरक्षा नियमांची प्रभावी अंमलबजावणी करून अपघातांचे प्रमाण कमी करण्याचे निर्देश दिले होते.त्या अनुषंगाने गडचिरोली जिल्ह्यात...

राज्यस्तरीय खरीप हंगाम आढावा बैठक-२०२६ संपन्न; राज्यात बियाण्यांचा पुरेसा साठा उपलब्ध.. – शेतकऱ्यांना कर्जपुरवठा सुरळीत करण्यावर भर..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-यंदाचा खरीप हंगाम एल निनो,बदलते हवामान आणि जागतिक खत परिस्थितीमुळे आव्हानात्मक ठरण्याची शक्यता असून,शेतकऱ्यांना वेळेवर कर्जपुरवठा,योग्य खत व्यवस्थापन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा...

बसचा अपघात; तिघांचा मृत्यू,तर अनेक प्रवाशी जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-एसटी महामंडळाच्या बसचा आज, गुरुवारच्या सकाळी भीषण अपघात होऊन तीन जणांचा मृत्यू झाला,तर ३० पेक्षा अधिक प्रवासी जखमी झाल्याची घटना गडचिरोली-चंद्रपूर...

लग्नाच्या स्वागत समारंभासाठी गेली ‘ती’ परतलीच नाही; १८ वर्ष व्हायला अवघे १५ दिवस होते बाकी..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-पाच दिवसांपूर्वी घरा शेजारी असलेल्या एका लग्नाच्या स्वागत समारंभासाठी गेलेली अल्पवयीन मुलगी अजूनपर्यंत घरी परतली नसल्याने कुटुंबीयांना मुलीची चिंता सतावत आहे.विशेष...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!