Wednesday, May 20, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तआचारसंहितेचा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर कोणताही परिणाम होणार नाही- कृषिमंत्री दत्तात्रय भरणे

आचारसंहितेचा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर कोणताही परिणाम होणार नाही- कृषिमंत्री दत्तात्रय भरणे

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यात विधान परिषदेच्या निवडणुका जाहीर झाल्याने शेतकरी कर्जमाफीबाबत अनेकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे.महत्वाचे म्हणजे,आचारसंहिता कालावधीत सरकारचे देणे बंद असते,म्हणजेच विविध योजनांच्या माध्यमातून पैश्याचे वितरण करण्यात येत नाही.अश्यातच राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज,बुधवार २० मे रोजी शेतकरी कर्जमाफीवर मोठे भाष्य केले आहे.विशेषतः जून महिन्यात राज्यातील मुख्य खरीप हंगामाच्या पेरण्यांना सुरुवात होते.या काळात शेतकऱ्यांना बियाणे,खते आणि इतर शेतीकामांसाठी नव्या पीक कर्जाची आवश्यकता असते.परंतु,जुन्या कर्जाच्या बोज्यामुळे अनेक शेतकरी बँकांच्या दारात थकबाकीदार ठरले आहेत.हीच अडचण ओळखून सरकारने खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच म्हणजेच ३० जूनपूर्वी कर्जमाफीची अंमलबजावणी करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, जेणेकरून शेतकऱ्यांना बँकांकडून पुन्हा नवीन पीक कर्ज मिळणे सुलभ होईल, त्यामुळे लागू झालेल्या आचारसंहितेचा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर कोणताही परिणाम होणार नसून,येत्या ३० जूनपूर्वी राज्यातील बळीराजासाठी कर्जमाफीची अधिकृत घोषणा केली जाईल,असे कृषिमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.कर्जमाफी हा सरकारचा पूर्वनियोजित आणि धोरणात्मक निर्णय असल्याने या प्रक्रियेत आचारसंहितेचा कोणताही कायदेशीर अडथळा येणार नाही.या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अत्यंत सकारात्मक असून, वित्तीय नियोजनाचा आढावा घेऊन लवकरच अंतिम निर्णय घेतला जाईल,असेही त्यांनी स्पष्ट केले.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

तेंदूपत्त्याच्या बोधभराईसाठी गेलेल्या कोंढाळा येथील इसमाचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  कोंढाळा(गडचिरोली):-बाहेर राज्यात तेंदूपत्त्याच्या बोधभराईसाठी गेलेल्या एका ४५ वर्षीय इसमाचा मृत्यू झाल्याची घटना आज,बुधवार २० मे रोजी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास उघडकीस आली.विशेष...

‘माझं गाव,आरोग्य संपन्न गाव’ मोहिमेत गडचिरोली जिल्ह्यातील ४५९ ग्रामपंचायतींचा उत्स्फूर्त सहभाग..

उद्रेक न्युज वृत्त  ​गडचिरोली :-ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम,गतिमान आणि लोकाभिमुख करण्यासाठी राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या संकल्पनेतून 'माझं...

मक्याच्या शेताला अचानक आग लागली; आग विझवायला धावला..पण जीवच गेला

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-शेतात राबराब-राबून मक्याचे पीक घेतले.पण, अचानकपणे शेतात आग लागल्याने ती विझवत असतांनाच एका ६५ वर्षीय शेतकऱ्याचा आगीच्या कचाट्यात सापडल्याने होरपळून दुर्दैवी...

खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न; उच्च न्यायालयाकडून एफआयआर आणि दोषारोपपत्र रद्द.. – आरमोरी तालुक्याच्या ठाणेगाव येथील प्रकरण..

उद्रेक न्युज वृत्त  ​आरमोरी(गडचिरोली):-वनविभागाच्या छाप्यानंतर केवळ सूड घेण्याच्या उद्देशानेच पोलिसांत खोटा गुन्हा दाखल करण्यात आला असून हा फौजदारी प्रक्रियेचा गैरवापर असल्याचे स्पष्ट करून मुंबई उच्च...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!