Tuesday, June 9, 2026
Homeगडचिरोलीउघड्यावर साठवलेले धान प्राधान्याने मिलर्सकडे द्या तसेच पावसाळ्यापूर्वी सर्व धानाची उचल...

उघड्यावर साठवलेले धान प्राधान्याने मिलर्सकडे द्या तसेच पावसाळ्यापूर्वी सर्व धानाची उचल पूर्ण करा- आदिवासी विकास मंत्री डॉ.अशोक उईके

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-उघड्यावर साठवलेले धान प्राधान्याने मिलर्सकडे देण्याचे तसेच पावसाळ्यापूर्वी सर्व धानाची उचल पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना आदिवासी विकास मंत्री डॉ.अशोक उईके यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या. कोणत्याही परिस्थितीत धानाचे नुकसान होऊ नये, यासाठी काटेकोर नियोजन करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळामार्फत गडचिरोली जिल्ह्यातील धान खरेदी प्रक्रियेचा आज,शनिवारी आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी सविस्तर आढावा घेतला.यावेळी आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा,आमदार डॉ.मिलिंद नरोटे,आदिवासी आयुक्त लीना बनसोड प्रामुख्याने उपस्थित होते.
बैठकीत धान वाहतुकीसाठी केंद्र शासनाच्या नियमानुसार शंभर टक्के जीपीएस यंत्रणा अनिवार्य असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.या बाबतीत कोणतीही सूट मिळणार नसून सर्व वाहतूक व्यवस्थेत पारदर्शकता आणि नियंत्रण राखण्यासाठी जीपीएस प्रणाली प्रभावीपणे राबविणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.तसेच धान साठवणुकीसाठी आवश्यक गोदामांची कमतरता लवकरात लवकर दूर करण्याचे निर्देश देत साठवण क्षमता वाढविण्यावर भर दिला.
नोंदणीकृत सर्व शेतकऱ्यांचा धान खरेदी-विक्री प्रक्रियेत सहभाग सुनिश्चित करणे गरजेचे असल्याचे सांगत वनपट्टा धारकांची ऑनलाईन नोंदणी पूर्ण करणे,ई-पीक पाहणी शंभर टक्के पूर्ण करण्यासाठी विशेष मोहीम राबविणे आणि सोसायट्यांमार्फत व्यापक जनजागृती करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
यावेळी राईस मिल असोसिएशनच्या प्रतिनिधींशी चर्चा करतांना धानाचा उतारा केंद्र शासनाच्या निकषानुसार ६७ टक्के अपेक्षित असतांना प्रत्यक्षात ५२ ते ५४ टक्के येत असल्याने नुकसान होत असल्याची बाब समोर आली.तसेच वाहतूक,हमाली आणि गोदाम उपलब्धतेबाबतच्या अडचणीही प्रतिनिधींनी मांडल्या.यावर संबंधित विभागांनी समन्वय साधून समस्यांचे तातडीने निराकरण करण्याचे निर्देश मंत्र्यांनी दिले.बैठकीला आदिवासी विकास विभागाचे विविध अधिकारी उपस्थित होते.यावेळी डॉ.उईके यांनी शबरी आदिवासी विकास महामंडळाच्या कर्ज योजनांचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांशी संवाद साधून त्यांनी सुरू केलेल्या स्वयंरोजगाराबाबत आढावा घेतला व त्यांचे कौतुक केले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

दुर्गम गडचिरोलीतील तब्बल ७८ विद्यार्थ्यांना देशातील नामांकित विद्यापीठांमध्ये प्रवेश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दुर्गम,नक्षलग्रस्त व आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील उच्च शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात आलेला ‘मिशन-२००’ हा उपक्रम...

अखेर नदीत बुडालेल्या तीन तरुणांचे सापडले मृतदेह; उर्वरित दोन युवकांचा शोध सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या घुग्गुस शहरातील पाच तरुण म्हातारदेवी परिसरातील वर्धा नदीवर पोहण्यासाठी गेले असता काल सोमवारच्या रात्री उशिरापर्यंत घरी परतले नसल्याने नदीत बुडाल्याची भीती...

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना झटका.. आता नऊ सिलेंडरवर नाही; तर चारच सिलेंडरवर मिळणार अनुदान..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच घरगुती स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरच्या दरात रविवार ७ जून २०२६ पासून २९ रुपयांची वाढ करण्यात आली आहे.त्यानुसार, बऱ्याचश्या जिल्ह्यांमध्ये गॅस सिलेंडरच्या किंमतींनी...

कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांनी आधार पडताळणी करणे आवश्यक..

उद्रेक न्युज वृत्त :-राज्यातील अनेक शेतकरी गेल्या काही वर्षापासून नैसर्गिक आपत्ती,अवकाळी पाऊस, उत्पादन खर्चातील वाढ आणि शेतमालाला न मिळणारा योग्य भाव,यामुळे आर्थिक संकटाचा सामना...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!