- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
आरमोरी(गडचिरोली):-भाजीपाला घेऊन गावाकडे परतणाऱ्या दुचाकीस्वारांना भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकने समोरून धडक दिल्याने धडकेत एकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला,तर एकजण गंभीर जखमी होऊन एकास किरकोळ दुखापत झाल्याची घटना काल सोमवारी सकाळच्या सुमारास आरमोरी तालुक्याच्या किटाळी बसस्थानक परिसरात घडली.अपघातात तुळशीदास रामाजी सहारे वय ४५ वर्षे, रा.देऊळगाव,ता.आरमोरी, जि.गडचिरोली यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला,तर त्यांचा मुलगा विरेंद्र सहारे हा गंभीर जखमी झाला व देऊळगाव येथील ४८ वर्षीय दिलीप सोमाजी टेकाम हे किरकोळ जखमी झाले.
काल सोमवारी सकाळच्या सुमारास एमएच ३४ पी ८७८५ क्रमांकाच्या दुचाकीने तुळशीदास,त्यांचा मुलगा विरेंद्र व गावातील दिलीप टेकाम हे तिघेही भाजीपाला घेऊन देऊळगावकडे परत निघाले होते.दरम्यान,किटाळी गावानजीक येताच बसस्थानक परिसरात टीएस ०७ युके ३९९२ क्रमांकाच्या ट्रकने समोरून येत दुचाकीला जोरदार धडक दिली.यात दुचाकीस्वार तिघेही खाली पडले.तुळशीदास सहारे यांना जबर मार लागल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला,तर मुलगा विरेंद्र गंभीर जखमी झाला.अपघाताचे दृश्य पाहून नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतीसाठी धावून गेले.जखमींना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले. घटनेची माहिती आरमोरी पोलिसांना मिळताच घटनास्थळी दाखल झाले.पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून ट्रक चालकासह ट्रक ताब्यात घेत ट्रक चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम २८१,१०६(१),१२५(अ),१२५(ब),३२४(४),१८४, १३४(अ)(ब)तसेच मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.ऐन प्रजासत्ताक दिनाच्या दिवशीच अपघातात जीव घेल्याने सहारे कुटुंबियांवर मोठा आघात झाला आहे.घटनेचा पुढील तपास आरमोरी पोलीस ठाण्याचे पीएसआय विजय चलाख यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
- Advertisement -

