Saturday, April 18, 2026
Homeचंद्रपूरसत्ता समीकरणाचा पेच कायम; वरिष्ठांच्या भेटी-गाठी वाढल्या..!

सत्ता समीकरणाचा पेच कायम; वरिष्ठांच्या भेटी-गाठी वाढल्या..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-राजकारणाची धुरा सांभाळणे मामुली गोष्ट नाही.निवडून येण्यासाठी जशी रात्रंदिवस मेहनत घ्यावी लागते,त्याहीपेक्षा सत्ता स्थापनेसाठी जीवाचे रान करावे लागते.केवळ निवडून आले म्हणजे झाले असे नाही,तर ज्यांची आवश्यकता आहे,अश्यांना भाऊ बटा करून सोबती बनवल्याशिवाय पर्याय नाही आणि असाच प्रकार हल्ली चंद्रपूर महानगरपालिकेच्या राजकीय समीकरणात पहावयास मिळत आहे.या ठिकाणी अद्याप सत्ता स्थापनेचा तिढा सुटता सुटेना.! असे झाले आहे.त्यामुळे वरिष्ठांच्या भेटी-गाठी वाढलेल्या दिसून येत आहेत. नुकतेच चंद्रपुरातील उद्धव ठाकरे शिवसेनेच्या आणि बहुजन वंचित बहुजन युतीच्या ८ नवनिर्वाचित नगरसेवकांसह २ अपक्षांनी मुंबईच्या मातोश्रीवर जात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. यावेळी शिवसेना नेते, खासदार संजय राऊत उपस्थित होते.आपल्याला जो पक्ष सन्मानाने सहकार्य करेल,अशा पक्षासोबत सत्ता स्थापन करा आणि स्थानिक पातळीवर तुम्ही निर्णय घ्या,असा सल्ला उद्धव ठाकरे यांनी नगरसेवकांना दिला होता.अश्यातच आता आमदार किशोर जोरगेवार आणि आमदार कीर्तीकुमार भांगडिया यांनी मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.विशेष म्हणजे,चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला २३ जागांवर तर शिवसेच्या शिंदे गटाला १ जागेवर विजय मिळाला असून,महायुतीकडे सध्या एकूण २४ नगरसेवकांचे संख्याबळ आहे.तर काँग्रेस पक्षाकडे २८ नगरसेवक आहेत.मात्र,६६ सदस्यांच्या महानगरपालिकेत स्पष्ट बहुमतासाठी किमान ३४ नगरसेवकांची आवश्यकता असून,महायुती अद्याप बहुमताच्या आकड्यापासून दूर आहे.तर उद्धव ठाकरे शिवसेनेचे ६ नगरसेवक,वंचित बहुजन आघाडीचे २ नगरसेवक असे या आघाडीचे ८ नगरसेवक निवडून आले आहेत.चंद्रपुर महानगरपालिकेत एकाही पक्षाला स्पष्ट बहुमत नसल्याने सत्ता समीकरणात शिवसेनेला महत्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे सत्तेच्या समीकरणात कोण बाजी मारणार? हे सांगताच येत नाही.कारण हे राजकारण आहे; यावर अधिक बोलणे उचित नाही.असेच म्हणावे लागेल.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वाढत्या उष्णतेपासून स्वतःचा बचाव करण्याचे आवाहन.. – उष्माघाताची लक्षणे आणि उपाययोजना..

उद्रेक न्युज वृत्त  ​गडचिरोली :-जिल्ह्यात सध्या तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत असून,कडक उन्हामुळे उष्माघात (Heat Stroke)होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ही बाब गांभीर्याने घेत जिल्हा आरोग्य...

सावधान..! प्रधानमंत्री लोन योजनेच्या नावाने बनावट जाहिरातीचा आधार..

उद्रेक न्युज वृत्त :-हल्ली फसवणूक करणाऱ्यांचे नेटवर्क दिवसेंदिवस वाढत चालल्याने नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे झाले आहे.कोणत्याही मोठ्या आमिषाला बळी पडण्यापूर्वी माहितीची खातरजमा करणे अत्यंत...

मोहफुले वेचत असतांनाच बिबट्याचा हल्ला.. – जंगलशिवारात छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळला मृतदेह..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या तुमसर वनपरिक्षेत्राच्या हरदोली सहवनक्षेत्रातील ३३६ कक्ष क्रमांकाच्या सोनेगाव बीटातील एकमध्ये बिबट्याने मोहफुले वेचत असणाऱ्या महिलेच्या मानेवर हल्ला चढवून ठार केल्याची...

बालविवाह रोखण्यासाठी प्रशासन ॲक्शन मोडवर.. – ग्रामीण भागात बालविवाह रोखण्याची जबाबदारी ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाऱ्यांवर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर दरवर्षी बालविवाहाच्या घटना घडण्याची शक्यता लक्षात घेता  गडचिरोली जिल्हा प्रशासन व महिला व बालविकास विभाग ॲक्शन मोडवर आले आहे.या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!