Wednesday, September 2, 2026
Homeभंडारागरिबांच्या ताटात जाणारा सरकारी तांदूळ प्रशासकीय उदासीनतेमुळे मातीमोल..

गरिबांच्या ताटात जाणारा सरकारी तांदूळ प्रशासकीय उदासीनतेमुळे मातीमोल..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-गरिबांच्या ताटात जाणारा सरकारी तांदूळ प्रशासकीय उदासीनतेमुळे कसा मातीमोल होतो,याचा प्रत्यय लाखांदूर येथे आला आहे.येथील अन्नपुरवठा विभागाच्या शासकीय गोदामात साठवून ठेवलेला सुमारे ९ हजार क्विंटल तांदूळ खराब गोदामामुळे आणि वेळेवर उचल न झाल्याने सडला आहे.आता हा खराब झालेला तांदूळ चाळणी आणि पॉलिश करण्यासाठी पुन्हा राईस मिलमध्ये पाठवण्याचे काम सुरू असून,यामुळे शासनाला लाखो रुपयांचा भुर्दंड व नुकसानीचा मोठा फटका बसला आहे.लाखांदूर तहसीलच्या अन्नपुरवठा विभागामार्फत सीएमआर अंतर्गत नागपूर जिल्ह्याला अंत्योदय आणि बीपीएल लाभार्थ्यांसाठी तांदूळ पुरवठा केला जातो. यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात भाड्याने घेतलेल्या एका गोदामात ९ हजार क्विंटल तांदूळ साठवण्यात आला होता.मात्र,या गोदामाची स्थिती तांदूळ साठवण्यायोग्य नव्हती.पावसाळ्यात छतातून पाणी गळल्याने आणि जमिनीतील ओलाव्यामुळे तांदळाला बुरशी लागली असून त्यात बारीक पीठ पडले आहे.तांदूळ जेव्हा नागपूर जिल्ह्याला पाठवण्यासाठी बाहेर काढण्यात आला,तेव्हा त्याची गुणवत्ता अत्यंत निकृष्ट असल्याचे दिसून आले.खराब दर्जामुळे नागपूरच्या पुरवठा विभागाने हा तांदूळ स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला.परिणामी,आता हा तांदूळ लाखांदूर तालुक्यातीलच राईस मिलमध्ये पाठवून त्यावर पुन्हा प्रक्रिया केली जात आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

जागतिक नारळ दिन विशेष..! नारळ लागवड; शाश्वत उत्पन्नाचा ‘कल्पवृक्ष’..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आज बुधवार २ सप्टेंबर दरवर्षी २ सप्टेंबर हा दिवस ‘जागतिक नारळ दिन’ म्हणून साजरा केला जातो. नारळाच्या झाडाचा जवळपास प्रत्येक भाग उपयोगात...

धक्कादायक..! जेवणाच्या डाळभाजीत पाल; ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-विद्यार्थ्यांच्या जेवणाच्या डाळभाजीत पाल (विचगुर)पडल्याने तब्बल ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे जाणवू लागल्याची घटना आज,मंगळवार १ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्याच्या...

अनाथ बालकांना योजनांचा लाभ वेळेत देण्याचे जिल्ह्याधिकाऱ्यांचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात महिला व बालकांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून पात्र लाभार्थ्यांपर्यंत त्यांचा लाभ वेळेत पोहोचवावा.बालविवाह व अल्पवयीन मातांशी...

आजपासून बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक व महिला प्रवाशांसाठी ‘एनसीएमसी’ कार्ड अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त :-एसटी महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करणाऱ्या विविध सवलतधारक प्रवाशांसाठी आज,मंगळवार १ सप्टेंबर पासून 'नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड' म्हणजेच संपर्करहित स्मार्ट कार्ड (एनसीएमसी)अनिवार्य करण्यात आले...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!