- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-जिल्ह्याच्या सिंदेवाही तालुक्यात आज, शनिवार १६ ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास नदीत पोहायला उतरलेल्या दोन १६ वर्षीय मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली.आयुष दीपक गोपाले वय १६ वर्षे व जीत टीकाराम वाकडे वय १६ वर्षे दोघेही रा.महालक्ष्मी नगर,सिंदेवाही,जि.चंद्रपूर अशी मृतकांची नावे आहेत.दोघेही दहावीत शिकत होते.घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
आयुष व जीत हे दोघेही शाळेला कृष्ण जन्माष्टमीची सुट्टी असल्याने आज शनिवारी दुपारच्या सुमारास सिंदेवाही शहरापासून काही अंतरावर असलेल्या टेकरी गावाजवळील नदी तीरावर फिरायला गेले होते.फिरून झाल्यानंतर दोघेही नदीत आंघोळीसाठी उतरले आणि पोहू लागले.पोहत असतांनाच पाण्याचा अंदाज न आल्याने खोल पाण्यात गेले.खोल पाण्यात जाताच दोघांचाही नदीत बुडून मृत्यू झाला. परिसरातील नागरिकांना दोघे पाण्यात बुडाल्याची माहिती मिळताच सिंदेवाही पोलिसांना कळविण्यात आले.पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचाव पथकाद्वारे दोघांचे मृतदेह बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी सिंदेवाही ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.घटनेचे दोन्ही कुटुंबियांवर मोठा आघात झाला असून परिसरात शोककळा पसरली आहे.पुढील तपास सिंदेवाही पोलीस प्रशासन करीत आहे.
- Advertisement -

