- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-दारू पिणाऱ्यांचे काही खरे नाही.कधी काय बोलतील याचा काही नेम नाही.त्यामुळे अश्यांच्या गोष्टींकडे अनेकजण दुर्लक्ष करून घेतात.पण, काहीजण दारूच्या नशेत जे काही बोलतात ते प्रत्यक्षात कृतीही करून दाखवत असतात.अशीच काहीशी घटना चंद्रपूर जिल्ह्याच्या सावली तालुक्यात नुकतीच उघडकीस आली आहे.तो नेहमी म्हणायचा की,मी एक दिवस मरून जाईन,दारूच्या नशेत बोलायचा त्यामुळे कुटूंबीय तसेच नातलगांनी दुर्लक्ष केले.मात्र,काल मंगळवारचा दिवस उजळला आणि तो खरोखरच मरून गेला.विशेष म्हणजे, सोमवारी २८ जुलैला कुटुंबीयांनी त्याची समजूत काढत,असे नको करुस म्हणून सांगितले.पण,त्याने कुटुंबीयांचे न ऐकता काल,मंगळवारी २९ जुलैला दुपारच्या सुमारास बकरी पालन शेडमध्ये गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली.सदरची घटना सावली तालुक्यातील गेवरा बुज येथे घडली असून प्रशांत विठ्ठल चौधरी वय ३२ वर्षे,रा.गेवरा बुज,ता.सावली असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.शेवटी मरून गेला,पण कुटुंबीयांना धक्का देऊन गेला.आई- वडील लहानाचे मोठे करतात.जीवापाड प्रेम करून पालनपोषण करतात,थोडे जरी लागले वा बरे वाटत नसल्यास तात्काळ काळजी करून दवाखान्यात नेत असतात.पण क्षुल्लकशा कारणावरून अनेकजण जीवाचे बरे-वाईट करून घेतात.घटना घडताच पाथरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक नितेश डोर्लीकर,मडावी,कोरे, गायकवाड,खंडाळे,शेंडे,बारेकर आदींनी घटनास्थळ गाठून पंचनामा करून आकस्मिक मृत्यूची नोंद करून शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबीयाकडे सुपूर्द केला.
- Advertisement -

