Tuesday, July 21, 2026
Homeभंडाराभंडाराच्या हर्षा भुरे उत्कृष्ट कवयित्री पुरस्काराने सन्मानित..

भंडाराच्या हर्षा भुरे उत्कृष्ट कवयित्री पुरस्काराने सन्मानित..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-नुकतेच काळीज माझं साहित्य छत्रपती संभाजीनगर समूहाचा तृतीय वर्धापन दिन सोहळा नाशिकच्या पार्क साईड नेस्ट सोसायटी परिसरात मोठ्या थाटात पार पडला.सोहळ्यास राज्यातील शंभरहून अधिक साहित्यिक तथा सामाजिक क्षेत्रात विशेष कार्य करणाऱ्या मान्यवरांनी उपस्थिती दर्शविली होती.तत्पूर्वी गुडीपाडवा समूहातर्फे ‘सण आला पाडव्याचा’ विषयावर कविता स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.यात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून एका पेक्षा एक दर्जेदार कवी, साहित्यिक स्पर्धेत सहभागी झाले होते.यामध्ये भंडारा येथील हर्षा भुरे यांनीही सहभाग घेतला होता. त्यानुसार त्यांच्या कवितेला उत्कृष्ट मानांकन देत रोख रक्कम व शाल देऊन सत्कार करण्यात आला.तसेच त्यांची मुख्य ओळख असलेले लाडूकाव्यला सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
सदर सोहळ्यास काळीज माझं साहित्य छत्रपती संभाजीनगर व काळीज प्रकाशन संस्थानचे अध्यक्ष सुरेखाताई बेंद्रे,संपादक,गीतकार,अभिनेता गुलाबराजा फुलमाळी,जेष्ठ साहित्यिक चंद्रकांत वानखडे यांच्या  हस्ते नाशिक येथे मान्यवरांचे सत्कार तथा बक्षीस वितरणाचा सोहळा उत्साहात पार पडला.हर्षा भुरे ह्या यापूर्वीही अनेक पुरस्काराने सन्मानित असून त्या नेदर्श प्रकाशन संस्था,साहित्य माझे जीवन, साहित्याचा गोडवा व लाडूकाव्यलेखन समूहाच्या संंस्थापिका आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन..पुढील चोवीस तास महत्वाचे; चार जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र राज्यातील विविध भागात पावसाने जोरदार हजेरी लावल्याचे चित्र आहे. हवामान विभागाने नुकतेच १९ जुलै ते २३ जुलै दरम्यान पाच दिवसांसाठी जोरदार...

ग्रामपंचायतींच्या जन सुविधा निधीत मोठी वाढ..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यातील ग्रामीण भागाचा विकास करतो म्हटले तर निधीचा अभाव,त्यातच निधीची कमतरता यामुळे स्थानिक पातळीवरील पायाभूत सुविधांचे बळकटीकरण करणे अशक्य होते.यासाठी ग्रामीण...

शेतकऱ्यांना हलक्यात घेऊन त्यांच्याशी राजकीय डावपेच खेळाल तर पेचात पडाल- आमदार रोहित पवार

उद्रेक न्युज वृत्त :-सध्या स्थितीत शेतकरी कर्जमाफी बाबत संभ्रम निर्माण झाला आहे.सरकारकडून नुसत्या तारखा देण्यात येत असल्याने शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरदचंद्र...

इंडिया स्किल्स स्पर्धेसाठी नोंदणी सुरू; राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर कौशल्य सिद्ध करण्याची संधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारत सरकारच्या कौशल्य विकास उपक्रमांतर्गत आयोजित 'इंडिया स्किल्स'(IndiaSkills) आणि 'वर्ल्ड स्किल्स'(WorldSkills) स्पर्धांसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून,त्या-त्या जिल्ह्यातील पात्र युवक-युवतींनी या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!