- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-राज्यात पावसाने उसंत घेतली असली तरीही काही ठिकाणी पाऊस अचानकपणे हजेरी लावून जात आहे.अश्याच प्रकारे काल,सोमवारी ९ जून रोजी चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याच्या काही भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली होती.चंद्रपूर जिल्ह्याच्या चिमूर तालुक्यातही काल सोमवारी जोरदार वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली.पाऊस सुरू होण्यापूर्वी मित्रांसह देवदर्शनासाठी गेलेल्या २० वर्षीय तरुणाच्या अंगावर वीज पडून मृत्यू झाला. सदरची घटना काल सोमवारी सायंकाळच्या सुमारास घडली.प्रथमेश अतुल वानखेडे रा.चिमूर, जि.चंद्रपूर असे मृतकाचे नाव आहे.
माहितीनुसार,चिमूर शहरापासून काही अंतरावर असलेल्या बोरगाव येथील हनुमान मंदिरात प्रथमेश वानखेडे व काही मित्र देवदर्शनासाठी गेले होते. काहीकाळ थांबल्यानंतर अचानकपणे ढगाळ वातावरण होऊन वादळी वाऱ्यासह पाऊस बरसू लागला.त्यातच विजांचे कडकडाट सुरू झाले. तितक्यातच प्रथमेशच्या अंगावर वीज कोसळली आणि त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला.
- Advertisement -

