Thursday, July 30, 2026
Homeभंडाराअखेर होणाऱ्या नवरदेव तरुणाचा आढळला मृतदेह.. - साक्षगंधाच्या कार्यक्रम दिवशीच झाला...

अखेर होणाऱ्या नवरदेव तरुणाचा आढळला मृतदेह.. – साक्षगंधाच्या कार्यक्रम दिवशीच झाला गायब..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-ऐन साक्षगंधाचा कार्यक्रम होणार,त्याच दिवशी होणारा नवरदेव पहाटेच्या सुमारास गायब झाल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली होती.बुधवारी ३० एप्रिलला सायंकाळच्या सुमारास त्याचे लग्न होते. अशातच होणारा नवरदेव गायब कां झाला? अश्या पेचप्रसंगात सर्वजण पडले होते.सदरची घटना भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील आलेसुर येथे नुकतीच उघडकीस आली होती.
माहितीनुसार,राहुल काशीराम राऊत वय २६ वर्षे
याचे बुधवारी ३० एप्रिलला सायंकाळच्या सुमारास विवाह सोहळा पार पडणार होता.तत्पूर्वी सोमवारी २८ एप्रिलला दुपारच्या सुमारास त्याचा साक्षगंधाचा कार्यक्रम होणार होता व मंगळवारी २९ एप्रिलला मंडप पूजन होते.अशातच राहुल हा २८ एप्रिलच्या पहाटे कुणालाही काहीही न सांगता घरून निघून गेला होता.कुटुंबियांच्या लक्षात येताच त्यांनी इतरत्र शोध घेतला.मात्र,त्याचा थांगपत्ताच लागलेला नव्हता. त्यामुळे कुटुंबीयांनी पोलीस ठाणे गाठून मिसिंगची तक्रार दाखल केली होती. कुटुंबीयांच्या तक्रारीवरून गोबरवाही पोलीस प्रशासन राहुलच्या शोधात होते. अशातच त्याचे प्रेत गावालगतच्या शेतातील विहिरीत आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ माजली आहे.सर्वत्र शोध सुरू असतांनाच गुरुवार १ मे रोजी सकाळी आठ वाजता गावालगत शेतामधील विहिरीत त्याचा मृतदेह आढळून आला.पोलिसांना माहिती कळविल्यावर पंचनामा करून पोलिसांनी विहिरीतून मृतदेह बाहेर काढला.त्याच्या शरीरावर कोणत्याही खुणा अथवा व्रण आढळून आले नाहीत.मृतदेहाचे शवविच्छेदन तुमसर येथे करण्यात आले.मृत्यूचे कारण अद्यापही कळलेले नसून त्याने आत्महत्या केली असावी,असा कयास बांधला जात आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आईसह दोन चिमुकल्या नदी व नाल्याच्या मधोमध अडकून पडल्या; धाडसी बचावकार्य..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यात काल बुधवारी दिवसभर सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे पामुलगौतम नदीसह परिसरातील नाल्यांना अचानक पूर आल्याने लाहेरी येथील एकाच कुटुंबातील तीन...

तुकाराम मुंढेंनी शाळा व्यवस्थापनावर सोपवली मोठी जबाबदारी; विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी विविध निर्णय..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या धडक कारवाईचे सत्र सुरू असतांनाच आता अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी...

माझा वाढदिवस-एक झाड उपक्रम; देसाईगंज आदर्श महाविद्यालयाच्या वतीने पर्यावरण संवर्धनाचा संदेश..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचावा आणि वृक्षारोपणाची सवय प्रत्येकामध्ये रुजावी या उद्देशाने आदर्श कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,देसाईगंज येथे "माझा वाढदिवस-एक झाड" हा...

राज्यांतर्गत पिकस्पर्धा; आता शेतकऱ्यांना घरबसल्या अर्ज करण्याची सुविधा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील अन्नधान्य,कडधान्य व गळीतधान्य पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी तसेच प्रयोगशील व प्रगतशील शेतकऱ्यांच्या कार्याचा गौरव करून आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!