Monday, September 7, 2026
Homeभंडारादुचाकी स्लीप होऊन बसचे चाक डोक्यावरून गेल्याने महिलेचा घटनास्थळीच मृत्यू..

दुचाकी स्लीप होऊन बसचे चाक डोक्यावरून गेल्याने महिलेचा घटनास्थळीच मृत्यू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 

भंडारा :-पती-पत्नी आणि मुले घेऊन आपले स्वगावी दुचाकीने जात असतांना वाटेतच दुचाकी स्लीप होऊन समोरून येणाऱ्या बसचे चाक खाली कोसळलेल्या पत्नीच्या डोक्यावरून गेल्याने महिलेचा घटनास्थळावरील जागेवरच मृत्यू झाल्याची घटना आज,रविवारी १६ मार्चला सकाळच्या सुमारास भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील वाहनी गावात घडली.मीना ओमेश्वर कळू वय ३३ वर्षे रा.चिखला ता. तुमसर,जि.भंडारा असे मृत महिलेचे नाव आहे. माहितीनुसार,ओमेश्वर कळू हा पत्नी आणि दोन लहान मुलींसोबत दुचाकीने आपल्या स्वगावी चिखला येथे जात होता.गावी जात असतांना वाहनी गावात सिहोराकडून बस येत होती.बस येत असल्याने ओमेश्वर कळूने आपले दुचाकी क्रमांक- एमएच ३६ ए ४०१ हे रस्त्याच्या कडेला उतरवली.रस्त्याच्या कडेला उतरवताच रस्त्यावर शेण पडलेला असल्याने दुचाकी स्लीप झाली.दुचाकी स्लीप होताच तितक्यातच बस आली.त्यामुळे ओमेश्वर व दोन मुले रस्त्याच्या डाव्या बाजुला पडले.तर मीना ही उजव्या बाजुला पडल्याने बसच्या चाकाखाली आली.बसचे चाक महिलेच्या डोक्यावरुन गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.घटना घडताच गावातील नागरिकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली होती.घटनेची माहिती सिहोरा पोलिस प्रशासनास होताच घटनास्थळ गाठून पंचनामा करण्यात आला व ओमेश्वर कळू यांच्या तक्रारीवरून चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.घटनेचा पुढील तपास सिहोरा पोलीस प्रशासन करीत आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नागपुरातील ऐतिहासिक ‘मारबत महोत्सव’ आजपासून सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरच्या सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य घटक असलेला ऐतिहासिक 'मारबत महोत्सव' आज,रविवार ६ सप्टेंबरपासून सुरू झाला.या वर्षीचा महोत्सव हा १४५...

‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद-२०२७’.. गडचिरोली जिल्ह्यातील युवकांना पंतप्रधानांसमोर नेतृत्वगुण,नवकल्पना मांडण्याची संधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याच्या संकल्पनेत युवाशक्तीचा सक्रिय सहभाग वाढविण्यासाठी ‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद -२०२७’ या राष्ट्रीय उपक्रमाला ‘विकसित...

पोलीस अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून एएसआयची आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  नवी मुंबई :-काही दिवसांपासून राज्यातील महाराष्ट्र पोलीस प्रशासनात खळबळ उडवून देणाऱ्या घटना उघडकीस येऊ लागल्या आहेत.मागील महिन्याच्या १६ ऑगस्टला नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयातील...

आता कांद्यानेही आणले सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी..

उद्रेक न्युज वृत्त :-बऱ्याच दिवसांपासून पांढऱ्या कांद्यानी सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणलेले असतांनाच आता लाल कांद्यानेही भाव खाऊन  सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे.हल्ली विविध शहरांच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!