Saturday, May 2, 2026
Homeआरमोरीआरमोरी येथे भारताचं विद्यापीठ रमाई महाकाव्य ग्रंथाचे प्रकाशन सोहळा संपन्न...

आरमोरी येथे भारताचं विद्यापीठ रमाई महाकाव्य ग्रंथाचे प्रकाशन सोहळा संपन्न…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
आरमोरी(गडचिरोली):-आरमोरी येथील पंचशील बुद्ध विहारात,संगीता वाल्मीक रामटेके(पाटील)यांनी आयोजित भारताचं विद्यापीठ रमाई महाकाव्यग्रंथाचा प्रकाशन सोहळा नुकताच संपन्न झाला असून भारताचं विद्यापीठ रमाई महाकाव्यग्रंथाचे संपादक प्रा.डॉ. अशोककुमार दवणे,नांदेड यांनी संपादन केलेल्या रमाई महाकाव्यग्रंथाचे प्रकाशन सामाजिक कार्यकर्त्या भूमिका बागडे यांचे हस्ते करण्यात आले.तर प्रकाशन सोहळ्याचे उद्घाटक म्हणून प्रा.जय फुलझेले आरमोरी यांनी तथागत भगवान बुद्ध,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस वंदन करून दीप प्रज्वलीत केले.  कार्यक्रमाचे अध्यक्षपद लता बरसागडे यांनी भूषविले तर सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून मीना सहारे  सामाजिक कार्यकर्ता इंदुरकर,सामाजिक कार्यकर्ते रोडगे,सिद्धार्थ साखरे,बारसागडे,शेंडे,पौर्णिमा पाटील, वणी इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सामाजिक कार्यकर्ती, कवयित्री,साहित्यिक संगीता रामटेके (पाटील) ह्यांनी केले.महाकाव्य ग्रंथाचा इतिहास अजरामर व्हावा,रमाईच्या जीवनावरील अनमोल दस्ताऐवज हा रमाई महाकाव्य ग्रंथाची प्रथमच निर्मिती करण्यात आलेली असून,महाराष्ट्रातील एकूण ३६ जिल्ह्यांमध्ये १५० ठिकाणी एकाच दिवशी प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.भारताचं विद्यापीठ रमाई महाकाव्यग्रंथात ३६९ कवी,कवियत्रिच्या कवितांचा समावेश असून त्यात गडचिरोली जिल्ह्यातील एकूण ११ कवी,कवियत्रीच्या कविता रमाई महाकाव्यग्रंथामध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत.
प्रसंगी सोहळ्याच्या अध्यक्षा लता बरसागडे म्हणल्या की,ग्रंथात रमाई जीवनावर कवींनी आपल्या रचना शब्दबध्द केल्या आहेत.हा ग्रंथ वाचनीय आहे तो सर्वांनी वाचावा.प्रा.जय फुलझेले यांनी सांगितले की, भारतचं रमाई महाकाव्य ग्रंथ इतिहासात अजरामर होणारा महाकाव्य ग्रंथ आहे.प्रथमच रमाई ग्रंथ प्रसिद्ध झाला झाला असल्याने याची इतिहासत नोंद होईल, असे मार्गदर्शन केले.तसेच रोडगे म्हणाले की,हा काव्य संग्रह नसून तो एक महाकाव्य ग्रंथ असे प्रतिपादन केले.कार्यक्रमाचे सूत्र संचालन मानसी पाटील यांनी केले तर उपस्थितांचे आभार सिद्धार्थ साखरे यांनी मानले.प्रकाशन सोहळ्याच्या यशस्वीतेकरीता राजकुमार देशपांडे,राजेंद्र बनसोड,छोटी बागडे,बादल शेंद्रे व समस्त उपासक,उपासिका यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

लाडक्या बहिणींना मोठा झटका; लाखो महिला अपात्र..

उद्रेक न्युज वृत्त :-राज्यातील अनेक कुटुंबांसाठी आधार देणारी व महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना देणारी महाराष्ट्र राज्यातील महायुती सरकारने जुलै-२०२४ पासून सुरू केलेली 'मुख्यमंत्री-माझी लाडकी...

पोलीस भरतीत पात्र ठरलेले युवक-युवतीचा कुरखेडा मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने सत्कार..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-गडचिरोली जिल्हा पोलीस भरतीत कुरखेडा शहराच्या मुस्लिम समाजातील एक युवक व एक युवती पात्र ठरले आहे.प्रथमच शहरातील मुस्लिम समाजाची युवक-युवती पोलीस दलात दाखल...

बारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर; यंदाही मुलींनीच मारली बाजी..

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या फेब्रुवारी- मार्च-२०२६ बारावी परीक्षेचा निकाल आज,शनिवार २ मे जाहीर करण्यात...

येत्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांच्या नावात आईचे नाव अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त :-आईच्या योगदानाला विशेष सन्मान देण्यासाठी,लिंग समानतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि सामाजिक समतोल राखण्यासाठी आता महाराष्ट्र राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या ओळखीच्या पद्धतीत महत्त्वपूर्ण बदल...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!