Tuesday, July 21, 2026
Homeभंडारा१३ खातेधारकांची रक्कम देण्यास टाळाटाळ; जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचा दणका.!

१३ खातेधारकांची रक्कम देण्यास टाळाटाळ; जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचा दणका.!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-राष्ट्रीयकृत बँकांऐवजी पतसंस्था वा काही सोसायट्या फिक्स डीपॉजिट म्हणजेच मुदत ठेव रकमेवर मोठा व्याज देत असल्याने अनेकजण यात गुंतवणूक करीत असतात.पण,काही सोसायट्या वा पतसंस्था खातेधारकांच्या रकमेवर डल्ला मारण्याचा प्रयत्न करीत असल्याचे बऱ्याच ठिकाणी उघड झाले आहे.असाच काहीसा प्रकार भंडारा जिल्ह्यात नुकताच उघडकीस आला आहे.भंडारा शहरातील गुरुकृपा अर्बन को-ऑपरेटिव्ह सोसायटीने तब्बल १३ मुदत ठेव खातेधारकांची रक्कम कालावधी पूर्ण होऊनही देण्यास टाळाटाळ केल्याने प्रकरणी खातेधारकांनी भंडारा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगात धाव घेतली.ग्राहक तक्रार निवारण आयोगाने सोसायटीच्या शाखा व्यवस्थापक आणि अध्यक्षांवर मानसिक आणि शारीरिक त्रासाबद्दल दंड, तक्रारीचा खर्च आणि व्याजासह ठेवीच्या परतफेडीचे आदेश दिले.त्याचबरोबर सदरची रक्कम ही संबंधित खातेधारकांना एका महिन्यात देण्यात यावी,असेही आदेशात नमूद करण्यात आले.यात ज्ञानदीप रामटेके(ठाणा),त्रिवेणी पांडुरंग बेलेकर (शहापूर),सचिन पांडुरंग बेलेकर(शहापूर),रमेश बळीराम साठवणे,सुरेश देवचंद चांदेवार,दीपक पांडुरंग बेलेकर (शहापूर),भास्कर बिसन साकुरे,मनोज भास्कर साकुरे, पारबताबाई भास्कर साकुरे,ममता दीपक बेलेकर (शहापूर),वंदना रमेश साठवणे(ठाणा पेट्रोल पंप),दिनकर आनंदराव क्षीरसागर,नंदिनी दिनकर क्षीरसागर इत्यादी १३ खातेधारकांचा समावेश आहे.सर्व १३ ग्राहकांनी गुरुकृपा अर्बन को-ऑप. सोसायटीमध्ये मुदत ठेवीअंतर्गत रक्कम गुंतविली होती.त्यासाठी निर्धारित दरानुसार व्याजही देण्याचे ठरले होते.आपल्या ठेवीची परिपक्वता पूर्ण झाल्यावर या ग्राहकांनी रकमेच्या परताव्याची मागणी केली.मात्र,टाळाटाळ करण्यात आली.समाधानकारक उत्तरही मिळाले नाही.त्यामुळे आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यावर या ग्राहकांनी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे अपील केले.प्रकरणी आयोगाने नोटीस बजावूनही अध्यक्ष आणि व्यवस्थापकाने त्यास प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे आयोगाने दोघांनाही दणका दिला.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन..पुढील चोवीस तास महत्वाचे; चार जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र राज्यातील विविध भागात पावसाने जोरदार हजेरी लावल्याचे चित्र आहे. हवामान विभागाने नुकतेच १९ जुलै ते २३ जुलै दरम्यान पाच दिवसांसाठी जोरदार...

ग्रामपंचायतींच्या जन सुविधा निधीत मोठी वाढ..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यातील ग्रामीण भागाचा विकास करतो म्हटले तर निधीचा अभाव,त्यातच निधीची कमतरता यामुळे स्थानिक पातळीवरील पायाभूत सुविधांचे बळकटीकरण करणे अशक्य होते.यासाठी ग्रामीण...

शेतकऱ्यांना हलक्यात घेऊन त्यांच्याशी राजकीय डावपेच खेळाल तर पेचात पडाल- आमदार रोहित पवार

उद्रेक न्युज वृत्त :-सध्या स्थितीत शेतकरी कर्जमाफी बाबत संभ्रम निर्माण झाला आहे.सरकारकडून नुसत्या तारखा देण्यात येत असल्याने शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरदचंद्र...

इंडिया स्किल्स स्पर्धेसाठी नोंदणी सुरू; राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर कौशल्य सिद्ध करण्याची संधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारत सरकारच्या कौशल्य विकास उपक्रमांतर्गत आयोजित 'इंडिया स्किल्स'(IndiaSkills) आणि 'वर्ल्ड स्किल्स'(WorldSkills) स्पर्धांसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून,त्या-त्या जिल्ह्यातील पात्र युवक-युवतींनी या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!