Thursday, August 6, 2026
Homeनवी दिल्लीलैंगिक अत्याचाराचा कठोर कायद्या झाला; पण काही लोक इतरांना त्रास देण्यासाठी शस्त्र...

लैंगिक अत्याचाराचा कठोर कायद्या झाला; पण काही लोक इतरांना त्रास देण्यासाठी शस्त्र म्हणून वापर करू लागले- उच्च न्यायालयाय – पुरुषाविरुद्धचा बलात्काराचा गुन्हा रद्द..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नवी दिल्ली :-लैंगिक अत्याचाराचा कठोर कायद्या झाला; पण काही लोक याचा इतरांना विनाकारण त्रास देण्यासाठी शस्त्र म्हणून वापर करू लागले असल्याचे दिल्ली उच्च न्यायालयाने निरीक्षण नोंदवित एका पुरुषाविरुद्धचा बलात्काराचा गुन्हा रद्द केला.
एका प्रकरणात पुरुषाने लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केल्याचे महिलेने तक्रारीत म्हटले होते. त्यानुसार पुरुषाविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.दाखल करण्यात आलेला गुन्हा रद्द करावा म्हणून पुरुषाने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली.ज्या महिलेने हा गुन्हा दाखल केला होता,ती महिला आणि सदर पुरुषाचा पूर्वीपासून संबंध होता.दोघांमधील संमतीने शारीरिक संबंध झाल्याचा दाखला देत न्यायालयाने या प्रकरणात बलात्काराचा पुरावा नसल्याचा निर्णय घेतला. न्यायमूर्ती चंद्र धारी सिंह म्हणाले की,ज्या तरतुदीनुसार एफआयआर दाखल करण्यात आला आहे.तो महिलांवरील सर्वात गंभीर अत्याचाराचा गुन्हा आहे.
तथापि,हे देखील एक प्रस्थापित सत्य आहे की,काही लोक याचा विनाकारण छळ करण्यासाठी शस्त्र म्हणून वापर करतात.दरम्यान,सदर प्रकरणात रेकॉर्डिंग, व्हॉट्सॲप चॅट्स आणि इतर गोष्टींमुळे पुरुष आणि स्त्रीने संमतीने शारीरिक संबंध ठेवण्यास सहमती दर्शविल्याचे स्पष्ट झाले आहे.न्यायालयाने सांगितले की,या प्रकरणाने निष्पाप व्यक्तींना कायदा कसा अवाजवी त्रास देऊ शकतो याचे उदाहरण दिले आहे. संबंध संपल्यानंतरही ही महिला त्या पुरुषाच्या संपर्कात होती,वैयक्तिक तपशील सदर पुरुषाला सांगत होती.त्यामुळे न्यायलयाने संपूर्ण प्रकरणाची पडताळणी करून पुरुषाविरुद्धचा बलात्काराचा गुन्हा रद्द केला.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

प्राप्त तक्रारींची दखल; जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानंतर पातागुडम-सोमनपल्ली महामार्गाच्या दुरुस्तीला गती..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या सिरोंचा तालुक्यातील सोमनपल्ली राष्ट्रीय महामार्गाच्या दुरावस्थेबाबत नागरिकांकडून सातत्याने प्राप्त होणाऱ्या तक्रारींची दखल घेत जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या निर्देशानंतर राष्ट्रीय महामार्ग...

सरकारने सरसकट थकबाकी द्यावी; अन्यथा बेमुदत धरणे आंदोलन.. – कंत्राटदार आक्रमक..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-सरकार केलेल्या कामांची थकबाकी देत नाही; पण नवीन कामे करवून घेत आहे.अश्यातच राज्यभरात विविध विभागातील कामांच्या सुमारे ९० हजार कोटी रुपयांच्या थकबाकीमुळे त्रस्त...

देसाईगंज,आरमोरी,कुरखेडा,कोरची व इतर पोलीस ठाण्याच्या ठाणेदारांच्या बदल्या..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या विविध पोलीस ठाण्यांसह उपपोलिस ठाणे व पोलिस मदत केंद्रांतील तब्बल ७२ अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या आहेत.या संदर्भात काल बुधवारी...

खासगी हॉस्पिटल्सचा संप; रुग्ण सेवा प्रभावित..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलने (एमएमसी)'सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्माकॉलॉजी' (सीसीएमपी)पूर्ण केलेल्या होमिओपॅथी(बीएचएमएस) डॉक्टरांना नोंदणी देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात राज्यभरातून वैद्यकीय असंतोषाचा वणवा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!