Wednesday, September 2, 2026
Homeचंद्रपूरमोठी बातमी शौचास गेलेल्या इसमाचा जंगली हत्तींनी उलचून आपटल्याने मृत्यू; आज...

मोठी बातमी शौचास गेलेल्या इसमाचा जंगली हत्तींनी उलचून आपटल्याने मृत्यू; आज सकाळची घटना..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-गडचिरोली जिल्ह्यातील टस्कर हत्तीच्या जोडीने दोन दिवसांपूर्वी म्हणजेच शुक्रवार १३ जून रोजी सावली वन परिक्षेत्रात प्रवेश केल्याने परिसरामध्ये भीतीचे वातावरण पसरले असतांनाच परत सिंदेवाही तालुक्यात प्रवेश करीत एका ४५ वर्षीय इसमास ठार केल्याची घटना सिंदेवाही तालुक्याच्या जाटलापूर मोठा येथे आज,रविवार १५ जून रोजी सकाळी ६.३० वाजताच्या सुमारास घडली.मारोती मसराम वय ४५ वर्षे, रा.जाटलापूर मोठा,ता.सिंदेवाही,जि.चंद्रपूर असे जंगली हत्तींच्या हल्ल्यात ठार झालेल्या इसमाचे नाव आहे.
काही दिवसांपूर्वी गडचिरोली जिल्ह्यातून चंद्रपूर जिल्ह्यात दाखल झालेले दोन जंगली हत्ती कधी सावली तालुक्यात तर कधी सिंदेवाही तालुक्यात मुक्तपणे संचार करीत आहेत.अश्यातच आज रविवारी सकाळच्या सुमारास सिंदेवाही तालुक्यातील जाटलापूर मोठा येथील मारोती मसराम हे नेहमीप्रमाणे गावालगत असलेल्या मोकळ्या परिसरात शौचासाठी गेले होते.शौचासाठी बसले असतांनाच  दोन हत्ती पोहोचले.हत्ती तिथे आल्याने मारोती अचानक उभा झाला.यामुळे हत्ती बिथरले आणि त्यांनी मारोतीला सोंडेत पकडून उचलले आणि जमिनीवर आपटले.यात मारोतीचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर दोन्ही हत्ती जंगलाच्या दिशेने निघून गेले. घटनेची माहिती मिळताच गावात एकच खळबळ उडाली.त्यानंतर गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत हत्तींना पळवून लावण्याचा प्रयत्न केला.घडलेल्या
घटनने परिसरातील गावांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून दोन्ही हत्तींचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

ग्रामसेवकांची वर्षातून केवळ एकच संवैधानिक ग्रामसभा घेण्याची मागणी..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्याच्या शिवरे दिगर येथे १५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळच्या सुमारास ग्रामसभे दरम्यान झालेल्या गोंधळ व दबावामुळे...

जागतिक नारळ दिन विशेष..! नारळ लागवड; शाश्वत उत्पन्नाचा ‘कल्पवृक्ष’..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आज बुधवार २ सप्टेंबर दरवर्षी २ सप्टेंबर हा दिवस ‘जागतिक नारळ दिन’ म्हणून साजरा केला जातो. नारळाच्या झाडाचा जवळपास प्रत्येक भाग उपयोगात...

धक्कादायक..! जेवणाच्या डाळभाजीत पाल; ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-विद्यार्थ्यांच्या जेवणाच्या डाळभाजीत पाल (विचगुर)पडल्याने तब्बल ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे जाणवू लागल्याची घटना आज,मंगळवार १ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्याच्या...

अनाथ बालकांना योजनांचा लाभ वेळेत देण्याचे जिल्ह्याधिकाऱ्यांचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात महिला व बालकांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून पात्र लाभार्थ्यांपर्यंत त्यांचा लाभ वेळेत पोहोचवावा.बालविवाह व अल्पवयीन मातांशी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!