- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :-सततची नापिकी,त्यातच कर्जाचे डोंगर, मुलींचे शिक्षण व अन्य खर्च भागविणे कठीण झाल्याने एकदाची कटकट संपवून टाकत भंडारा जिल्ह्याच्या
साकोली तालुक्यातील विर्शी येथील नोगेश शालिकराम मांढरे वय ४७ वर्षे या अल्पभूधारक शेतकऱ्याने शेतातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल बुधवारी उघडकीस आली.नोगेश मांढरे यांची विर्शी शिवारात पावणेदोन एकर शेती आहे.आधीच अल्पभूधारक व त्यात आलेल्या नापिकीमुळे ते त्रस्त झाले होते.याशिवाय घराचे बांधकाम सुरू असल्याने ते मानसिक तणावात होते. मुलींचे शिक्षण व अन्य खर्च कसा भागवावा,या विवंचनेत होते.त्यांच्यावर विविध सेवा सहकारी संस्थेचे कर्ज आहे.नापिकी आणि आर्थिक परिस्थितीला कंटाळून नोगेश यांनी शेतातील मोहाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली.
शेतकरी नोगेश काल बुधवारी सकाळी शेतात गेले होते.त्यांची आई व मुलगी शेतात गेले असता ही घटना उघडकीस आली.त्यांना साकोली येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले.मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.त्यांच्या मागे आई-वडील, पत्नी,चार मुली व मोठा आप्त परिवार आहे.शासनाने मांढरे कुटुंबाला मदत करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.मांढरे यांची मोठी मुलगी मलगी पदवीधर झाली असून अन्य बहिणी शिक्षण घेत आहेत.परिवारात नोगेश हेच एकमेव कमावते होते.शेतीच्या भरोशावरच त्यांचा प्रपंच सुरू होता. विशेष म्हणजे, अवघ्या तीन दिवसांपूर्वी घरकुलाच्या स्लॅबचे काम झाले होते.या घरकुलासाठी निधी अपुरा असल्याने ते विवंचनेत होते.त्यामुळेच त्यांनी एवढे टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे.
- Advertisement -

