Wednesday, June 10, 2026
Homeदेसाईगंजब्रम्हपुरी-देसाईगंज मार्ग बंद; रपटा गेला वाहून..

ब्रम्हपुरी-देसाईगंज मार्ग बंद; रपटा गेला वाहून..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली) :-मागील दोन वर्षांपासून भुती नाल्यावरील इंग्रजकालीन पूल जीर्ण झाल्याने नव्या पुलाचे बांधकाम संथगतीने सुरू आहे.अश्यातच आवागमन करण्यासाठी भुती नाल्याच्या बाजूला
वळण मार्ग म्हणून तात्पुरता रपटा(कच्चा रस्ता)तयार करण्यात आला होता.मात्र,तीन दिवसांपासून दररोज पडणाऱ्या पावसामुळे ब्रम्हपुरी-देसाईगंज महामार्गावरील रपटा वाहून गेल्याने मार्गावरील जड वाहतूक पूर्णतः बंद झाली आहे.त्यातच दुचाकीधारक पर्यायी मार्गाचा वापर करीत आहेत.पर्यायी मार्गावर लहान पूल असल्याने अनेकजण जीव धोक्यात घालून प्रवास करू लागलेत. त्यामुळे एखादेवेळी अनुचित घटना घडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.सध्या स्थितीत पाऊस थांबण्याचे नाव घेत नसल्याने पाण्याचा प्रवाह वाढून परत पुन्हा संपूर्ण मार्ग बंद पडू शकतो.पुलावरून पाणी वाहत असतांना दुचाकी वा इतर वाहनांनी रस्ता ओलांडू नये,असे प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत असले तरीही काहीजण याकडे दुर्लक्ष करतांना दिसून येतात.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

दुर्गम गडचिरोलीतील तब्बल ७८ विद्यार्थ्यांना देशातील नामांकित विद्यापीठांमध्ये प्रवेश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दुर्गम,नक्षलग्रस्त व आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील उच्च शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात आलेला ‘मिशन-२००’ हा उपक्रम...

अखेर नदीत बुडालेल्या तीन तरुणांचे सापडले मृतदेह; उर्वरित दोन युवकांचा शोध सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या घुग्गुस शहरातील पाच तरुण म्हातारदेवी परिसरातील वर्धा नदीवर पोहण्यासाठी गेले असता काल सोमवारच्या रात्री उशिरापर्यंत घरी परतले नसल्याने नदीत बुडाल्याची भीती...

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना झटका.. आता नऊ सिलेंडरवर नाही; तर चारच सिलेंडरवर मिळणार अनुदान..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच घरगुती स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरच्या दरात रविवार ७ जून २०२६ पासून २९ रुपयांची वाढ करण्यात आली आहे.त्यानुसार, बऱ्याचश्या जिल्ह्यांमध्ये गॅस सिलेंडरच्या किंमतींनी...

कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांनी आधार पडताळणी करणे आवश्यक..

उद्रेक न्युज वृत्त :-राज्यातील अनेक शेतकरी गेल्या काही वर्षापासून नैसर्गिक आपत्ती,अवकाळी पाऊस, उत्पादन खर्चातील वाढ आणि शेतमालाला न मिळणारा योग्य भाव,यामुळे आर्थिक संकटाचा सामना...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!