उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :- आज राज्यभरात बारावीचा निकाल जाहीर झाला. सर्वच विद्यार्थी निकाल पाहून यश प्राप्त केल्यानंतर आनंद साजरा करीत असताना चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यात नेरी येथे दुर्दैवी घटना समोर आली आहे. येथील एका विद्यार्थ्याने बारावीत अपयश आल्याने जीवनयात्रा संपवली.आकाश पुरुषोत्तम वैरागडे वय १८ वर्षे,रा.नेरी,ता. चिमूर असे मयत विद्यार्थ्याचे नाव आहे.या घटनेने संपूर्ण नेरी गावावर शोककळा पसरली आहे.
प्राप्त माहितीनूसार,चिमूर तालुक्यातील नेरी येथील आकाश पुरुषोत्तम वैरागडे हा विद्यार्थी चिमूर येथील नेहरू कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेत होता.बारावीची परीक्षा झाली आणि पेपरसुद्धा चांगले गेले असल्याने परीक्षेत चांगल्या गुणांनी यश संपादन करिन असा त्याचा आत्मविश्वास होता. आज मंगळवारी मात्र निकाल लागताच नेट वरून निकाल पाहताच त्याला धक्का बसला.अभ्यास व मेहनत करूनही त्याला इंग्रजी व इतिहास या विषयात कमी गुण मिळाल्याने तो नापास झाला त्यामुळे तो नैराश्यात गेला.त्याने जीवनयात्रा संपविण्याचा निर्णय घेत घरात कुणीही नसतांना दरवाजा बंद करून दोराने दुपारी २ वाजताच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली.ही घटना सायंकाळी उघडकीस आली.
सदर घटनेची माहिती बाहेरून सायंकाळी ६ वाजता दरम्यान घरी परत आलेल्या भावाला माहित झाली.घराचा दरवाजा आतून बंद असल्याचे त्याने आवाज देऊनही आतून प्रतिसाद न आल्याने दरवाजा तोडण्यात आला.त्यावेळी भावाला धक्का बसला.मृत्तदेह घराला लटकलेल्या अवस्थेत आधळून आला. शेतात कामाला गेलेले आई वडील घरी पोहचले. त्यांनाही धक्का बसला.मृत्यूची वार्ता गावात पसरताच आकाशला बघण्यासाठी घरासमोर गर्दी झाली.सदर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.त्यांनी तपास सूरू केला आहे.परंतू आकाशने आज घोषीत झालेल्या बारावीच्या परीक्षेत दोन विषयात नापास झाल्याने त्याने आत्महत्या केल्याचे कारण समोर येत आहे.सदर घटनेने नेरी गावावर शोककळा पसरली.

