Friday, May 1, 2026
Homeभंडारादुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने तिघांचा झाला अपघात..-रुग्णालयात नेताना दोघांचा मृत्यू…

दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने तिघांचा झाला अपघात..-रुग्णालयात नेताना दोघांचा मृत्यू…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

भंडारा :- नातेवाईकांकडे स्वागत समारंभाच्या कार्यक्रमासाठी गेलेले ३ मित्र स्वागत समारोहाजवळच असलेल्या एका खाली मैदानात बसण्यासाठी गेले होते.तिथून दुचाकीने परत येत असताना वळणावर दुचाकीवरील नियंत्रण सूटुन ती खड्ड्यात कोसळली. यात दुचाकींवरील तिघेजण गंभीर जखमी झाले. त्यांना रुग्णालयात नेताना दोघांचा मृत्यू झाला.ही घटना  लाखांदूर ते पिंपळगाव मार्गावर घडली.

पियुष विजयकुमार तिरपुडे वय २४ वर्षे रा.अर्जुनी मोर, लकी भारत नाकाडे वय २० वर्षे रा.ब्रम्हपुरी अशी मृतक युवकांची नावे आहेत.भरधाव वेगाने दुचाकी चालवत येत असताना वळणावर दुचाकीवरील नियंत्रण सुटले व एका खड्ड्यात दुचाकी कोसळली. यात दुचाकीवरील तिघेही जण रस्त्यावर कोसळून गंभीर जखमी झाले.तिघांवरही लाखांदूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करून पुढील उपचारासाठी ब्रह्मपुरी येथील एका खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले.मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच दोघांचा मृत्यू झाला होता.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

मोठा अनर्थ टळला; चक्क धावत्या बसचे चाक निघाल्याने प्रवाशांमध्ये खळबळ..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-कधीकाळी धावती बस अचानकपणे बंद पडते, तर कधी गाडीच्या वरचा छप्परच उडून जातो.पावसात तर काही बसेसमध्ये चक्क छतावरून पाणी गळायला लागतो.अश्या...

हॉटेलचा नाश्ता महागणार; व्यवसायिक सिलेंडरच्या दरात सर्वात मोठी वाढ.. – सर्वसामान्यांच्याच खिशाला कात्री..

उद्रेक न्युज वृत्त :-महिन्याच्या सुरुवातीलाच कमर्शियल म्हणजेच व्यवसायिक गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे.आज,शुक्रवार १ मे रोजी १९ किलोच्या व्यवसायिक सिलेंडरच्या किंमतीत...

उद्याला बारावीचा ऑनलाइन निकाल..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचा निकाल कधी लागणार,याची उत्सुकता असतांनाच राज्य बोर्डाने काल गुरुवारच्या रात्री परिपत्रक काढत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च...

महाराष्ट्र राज्याचा ६७ वा स्थापना दिन उत्साहात साजरा.. महाराष्ट्र दिनी “समृद्ध गडचिरोली” घडविण्याचा संकल्प..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र राज्याच्या ६७ व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांनी “समृद्ध गडचिरोली” घडवण्याचा संकल्प व्यक्त करत विकास, शांतता...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!