Monday, May 25, 2026
Homeभंडारातब्बल १३ वर्षे सेवा बजावलेल्या शिक्षकाने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा..!

तब्बल १३ वर्षे सेवा बजावलेल्या शिक्षकाने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-मनमिळावू स्वभाव असलेल्या शिक्षकाने अचानकपणे टोकाचे पाऊल उचलत जंगलातील एका झाडाला नायलॉन दोरीने गळफास घेऊन जीवनयात्रा संपविल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्काच बसला आहे.रमेश शामराव पंचबुद्धे वय ४२ वर्षे रा.खुर्शीपार, ता.भंडारा असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या शिक्षकाचे नाव असून त्यांनी तब्बल १३ वर्षे सेवा बजावली होती.ते मानेगाव बाजार येथील चैतन्य विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात इंग्रजी विषयाचे शिक्षक होते.
रमेश पंचबुद्धे हे काल सोमवारी सकाळच्या सुमारास शाळेत कर्तव्यावर न जाता भंडारा तालुक्याच्या रावणवाडी-धारगाव जंगल परिसरात गेले होते.त्यांच्या मनात काय घर करून सोडत होते,याची कल्पना कुणालाही आली नाही.अश्यातच दुपारी १ वाजेच्या सुमारास काही नागरिकांना रावणवाडीच्या जंगलात एका झाडाला नायलॉन दोरीने गळफास घेतलेल्या स्थितीत त्यांचा मृतदेह दिसून आला.लागलीच सदरची माहिती अड्याळ पोलिसांना देण्यात आली. घटनास्थळी अड्याळ पोलिसांचे पथक दाखल होत पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी अड्याळ ग्रामीण रुग्णालयात पाठवला.रमेश पंचबुद्धे यांनी आत्महत्या कां केली,याचा शोध अड्याळ पोलिस प्रशासन करीत आहे.रमेश पंचबुद्धे यांच्या पश्चात पत्नी,दोन मुली असा आप्त परिवार आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नागरिकांनी लोकशाही दिनात तक्रारी व निवेदने सादर करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन  येत्या,सोमवार १ जून २०२६ रोजी दुपारी ३ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येथील सभागृहात करण्यात आले आहे.जिल्ह्यातील नागरिकांनी...

देशात जनगणनेची प्रक्रिया सुरू झाली; पण ओबीसी समाजासाठी स्वतंत्र रकानाच नाही.. देसाईगंज तालुका ओबीसी समाज संघटनेच्या वतीने उपविभागीय कार्यालयावर धडकणार ‘भव्य मोर्चा’..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):- "आमची संख्या,आमचा हक्क,आमचा सन्मान!" आणि "जनगणनेत स्वतंत्र कॉलम,आमचा हक्क!" अशी गगनभेदी गर्जना करत देसाईगंज तालुका ओबीसी समाज संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात...

रोजगार हमी योजनेच्या कायद्याची जागा घेणाऱ्या ‘व्हीबी-जी राम जी’ योजनेत १२५ दिवस काम देण्याची हमी..

उद्रेक न्युज वृत्त :-बऱ्याच कालावधीपासून सुरू असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना-२००५ कायद्याची जागा आता 'विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजिविका...

सामान्य माणसाचा जीव २५ लाखांचा ठरवत असाल तर तुम्ही स्वतः वाघासमोर उभे राहा; आम्हीही तुम्हाला २५ लाख देतो..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-नुकतेच चंद्रपूर जिल्ह्याच्या सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही परिसरात वाघाच्या हल्ल्यात चार महिलांचा मृत्यू झाला.या घटनेने सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे.या पार्श्वभूमीवर सामाजिक...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!