Saturday, June 20, 2026
Homeचंद्रपूरठाणेदाराची उचलबांगडी; पोलिस उपनिरीक्षकाचे लाच प्रकरण भोवले...

ठाणेदाराची उचलबांगडी; पोलिस उपनिरीक्षकाचे लाच प्रकरण भोवले…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-चंद्रपूर जिल्ह्यातील महत्त्वाच्या ठाण्यांपैकी एक ठाणे म्हणून बल्लारपूर ठाण्याची ओळख आहे. त्यामुळे या ठाण्यासाठी अधिकाऱ्यांची विशेष रुची असते. अशातच मागील सहा महिन्यांपूर्वी बल्लारपूर पोलिस ठाण्याची धुरा हाती घेतलेल्या सुनील गाडे यांची पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी मंगळवारी तडकाफडकी बदली केली.त्यांच्या जागी श्याम गव्हाणे यांनी काल बुधवारी बल्लारपूर ठाण्याची सूत्रे स्वीकारली.दोन दिवसांपूर्वी बल्लारपूर येथील पोलिस उपनिरीक्षक हुसेन शहा यांच्यावर लाच घेतल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता.ठाणेदार गाडे या प्रकरणाचा बळी ठरल्याचे बोलल्या जात आहे.विशेष म्हणजे मागील वर्षभरात या ठाण्यात तीन ठाणेदार बदलले आहेत. फेब्रुवारी २०२४ रोजी आसिफ राजा शेख यांनी बल्लारपूर ठाण्याची सूत्रे हाती घेतली होती.त्यानंतर कामकाज सुरू केले. काही प्रकरणांचा त्यांनी छळाही लावला होता.
बल्लारपूर पेट्रोल बॉम्ब हल्ला प्रकरण घडताच त्यांची चार महिन्यांत रामनगर ठाण्यात बदली करून रामनगरचे ठाणेदार सुनील गाडे यांच्याकडे बल्लारपूरची सूत्रे देण्यात आली.मात्र मंगळवारी त्याची तडकाफडकी बदली करून श्याम गव्हाणे यांच्याकडे सूत्रे देण्यात आली.त्यामुळे पोलिस प्रशासन सुरळीत होईल,असे वाटत होते. बल्लारपूर ठाण्यातील पीएसआयने घेतलेल्या लाच प्रकरणातून त्यांची बदली करण्यात आल्याचे बोलले जात असले तरीही बल्लारपुरात नव्याने रुजू झालेल्या ठाणेदारावरही गडचिरोलीत लाचलुचपत विभागाची कारवाई झाली आहे.त्यामुळे या बदलीबाबत पोलिसांत चर्चा रंगत आहेत.बदलीच्या काही कारणांचीही कुजबूज सुरू झाली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

तीन तिघडा अन् काम बिघडा..! वन परिक्षेत्र अधिकारी,वनरक्षक व खाजगी इसम एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त गडचिरोली :-अनेकांना वाटतेय की,एखाद्या तिसऱ्याच व्यक्तींच्या माध्यमातून पैश्याची रक्कम घेतली,तर आपले नाव वा आपली करणी उजेडात येणार नाही.पण,लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तसला...

गडचिरोली जिल्ह्यात जलसंधारणाच्या कामांमुळे लक्षणीय पाणीसाठा निर्माण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात मागील दोन वर्षांत विविध योजनांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर जलसंधारणाची कामे करण्यात आली आहेत.या कामांमुळे जिल्ह्यात लक्षणीय पाणीसाठा निर्माण झाला असून...

आता भाडेपट्ट्यावरील शासकीय जमिनींच्या अधिकार अभिलेखात असणार ‘महाराष्ट्र शासन’ कब्जेदार..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यातील भाडेपट्ट्याने प्रदान करण्यात आलेल्या शासकीय जमिनींच्या अधिकार अभिलेखातील नोंदी अधिक अचूक,पारदर्शक आणि एकसमान करण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.मुख्यमंत्री...

वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-वाघाच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नागभीड तालुक्यातील गिरगाव येथे आज,शुक्रवार १९ जून रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली.आत्माराम दसरू बोरकर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!