Sunday, April 19, 2026
Homeमुंबईचार महिन्याच्या मुलीची हुद्द बापानेच पाळण्याच्या दोरीने गळा आवळून केली हत्या..

चार महिन्याच्या मुलीची हुद्द बापानेच पाळण्याच्या दोरीने गळा आवळून केली हत्या..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
मुंबई :-अवघ्या चार महिन्याच्या मुलीची हुद्द बापानेच पाळण्याच्या दोरीने गळा आवळून हत्या केल्याची घटना काल शनिवारी मुंबईच्या घाटकोपर कामराज नगरमध्ये घडली.याप्रकरणी आरोपी पालक संजय कोकरे याला पंतनगर पोलिसांनी अटक केली आहे.
अधिक माहिती अशी की,कोकरे यांना अगोदरच दोन मुली आहेत.त्यातच तिसरीही मुलगी झाल्याने बापाचा राग अनावर झाला.घटनेच्या वेळी चिमुकलीची आई ही कामानिमित्त बाहेर गेली होती तर मुलगी पाळण्यात झोपलेली होती.तेवढ्यात संजय कोकरे याने निष्पाप, निरागस चिमुकलीचा मुलगी ज्या पाळण्यात झोपली होती,त्याच पाळण्याच्या दोरीने तिचा गळा आवळला. काही वेळाने जेव्हा मुलीची आई घरी आली,तेव्हा तिला चिमुकली काहीही हालचाल करीत नसल्याचे लक्षात येताच सदरची घटना उघडकीस आली.आपले मुल गेल्याचे पाहताच आई बेशुध्द पडली.घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पंतनगर पोलिसांनी घटनास्थळ गाठून आरोपी संजय कोकरे यांस अटक करून पुढील तपास सुरू केला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

विद्यार्थ्यांची सुरक्षितता महत्त्वाची; सर्व शैक्षणिक संस्था सकाळच्या सत्रात सुरू ठेवण्याचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-दिवसेंदिवस उष्णतेची तीव्रता वाढत असल्याने शाळा व महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.अश्यातच चंद्रपूर जिल्ह्यात उन्हाची...

चहा बनवण्यासाठी गॅस पेटवणार तितक्याच उडाला भडका; पतीचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-स्वयंपाकघरातील गॅस लिकेज असल्याने चहा बनवण्यासाठी गॅस पेटवणार तितक्याच आगीचा अचानकपणे भडका उडाला आणि काही क्षणातच सिलिंडरचा जोरदार स्फोट झाला.दरम्यान,संपूर्ण घरात...

वाहनधारकांसाठी दिलासा; गडचिरोली शहरातील ट्रॅफिक सिग्नल काही वेळासाठी राहणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-विदर्भातीलच नव्हे तर राज्याच्या विविध जिल्ह्यात उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. सकाळपासूनच उन्हाची तीव्रता वाढत चालल्याने जीवाची लाहीलाही होत आहे.अश्यातच शहरातील महत्त्वाच्या...

उष्णतेची तीव्रता; प्रखर उन्हामुळे शेतातच पडली बेशुद्ध.. – शेतकरी महिलेचा मृत्यू; नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात उष्णतेचा पारा चढल्याने आरोग्य विभागासह प्रशासन सतर्क झाले आहे.त्यातच,नागरिकांना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करत आहे.विशेष म्हणजे,दुपारी १२...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!