Friday, June 19, 2026
Homeचंद्रपूरचंद्रपुरात सचिन रामटेके यांनी ईव्हीएम हटावचा नारा देत बेमुदत उपोषणाला केली सुरुवात...

चंद्रपुरात सचिन रामटेके यांनी ईव्हीएम हटावचा नारा देत बेमुदत उपोषणाला केली सुरुवात…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 

चंद्रपूर :-राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीला जनतेनी दिलेला कौल नसून ईव्हीएमने दिलेला विजय आहे; असे मानून विरोधकांनी ईव्हीएमविरोधात आंदोलने सुरू केली आहेत.शुक्रवारी ६ डिसेंबरला चंद्रपुरातून ईव्हीएमविरोधात आंदोलनाची सुरुवात करण्यात आली आहे.काँग्रेसचे परिवहन विभागाचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष सचिन रामटेके यांनी ईव्हीएम हटाव; असा नारा देत बेमुदत उपोषणाला सुरुवात केली.विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात ईव्हीएमद्वारे घोळ करीत महायुतीने निवडणुका जिंकल्या आहे; त्यामुळे आता ईव्हीएम बंद करीत बॅलेट पेपरवर निवडणुका व्हायला हव्या, यासाठी आपण उपोषण करीत आहो; अशी प्रतिक्रिया रामटेके यांनी दिली.ईव्हीएममुळे लोकशाही धोक्यात आली आहे; जर असेच सुरू राहिले तर पुढच्या काळात निवडणुका घेण्याची गरज सत्ताधारी पक्षाला भासणार नाही.कारण ते मशिनद्वारे बहुमत सहजरित्या मिळवू शकतात,विरोधी पक्षाला संपविण्याचा हा भाजप सरकारचा डाव आहे.जोपर्यंत ईव्हीएम बंद होणार नाही; तोपर्यंत आमचे आंदोलन सुरू राहणार आहे; असाही इशारा रामटेके यांनी दिला आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

देसाईगंजात सुगंधित तंबाखूविक्री जोमात; आरमोरीत अवैध सट्टा-पट्टी,तर कुरखेड्यात दारूचा महापूर..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या विविध तालुक्यात अवैध धंद्यांनी डोके वर काढले असून देसाईगंज शहर व तालुक्यात सुगंधित तंबाखूची खुलेआम विक्री,तर आरमोरी शहरापासून ते ग्रामीण...

जीएसटी नंबर मिळवून दिले नं..! आता दहा हजार द्या.. – राज्यकर निरीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-गलेलठ्ठ पगार असतांना एकदा कां ओवर कमाईची सवय लागली रे लागली,तर मग ज्या टेबलावर कुठलेही काम मोफत जरी होत असेल तरी...

स्थानिक उत्पादनांना मिळणार नवी ओळख; गडचिरोली ब्रँडसाठी स्वतंत्र लोगो आणि टॅगलाईन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-स्थानिक उत्पादनांना जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी स्वतंत्र 'गडचिरोली ब्रँड' विकसित करणे,पर्यटन विकासाला गती देणे,महिला बचत गटांना अधिक सक्षम बनविणे,धान साठवणुकीची क्षमता...

गडचिरोलीतील सहा लोहखनिज खाणी महाराष्ट्र राज्य खनिज महामंडळाला द्याव्यात- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – गडचिरोली हे भविष्यात देशातील महत्त्वाचे औद्योगिक व पोलाद उत्पादन केंद्र म्हणून...

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-महाराष्ट्राला देशातील ‘ग्रीन स्टील हब’ बनविण्याच्या उद्देशाने केंद्रीय कोळसा व खनिकर्म मंत्रालयाने गडचिरोलीतील सहा लोहखनिज खाणी महाराष्ट्र राज्य खनिज महामंडळाला द्याव्यात,अशी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!