चंद्रपूर :-राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीला जनतेनी दिलेला कौल नसून ईव्हीएमने दिलेला विजय आहे; असे मानून विरोधकांनी ईव्हीएमविरोधात आंदोलने सुरू केली आहेत.शुक्रवारी ६ डिसेंबरला चंद्रपुरातून ईव्हीएमविरोधात आंदोलनाची सुरुवात करण्यात आली आहे.काँग्रेसचे परिवहन विभागाचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष सचिन रामटेके यांनी ईव्हीएम हटाव; असा नारा देत बेमुदत उपोषणाला सुरुवात केली.विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात ईव्हीएमद्वारे घोळ करीत महायुतीने निवडणुका जिंकल्या आहे; त्यामुळे आता ईव्हीएम बंद करीत बॅलेट पेपरवर निवडणुका व्हायला हव्या, यासाठी आपण उपोषण करीत आहो; अशी प्रतिक्रिया रामटेके यांनी दिली.ईव्हीएममुळे लोकशाही धोक्यात आली आहे; जर असेच सुरू राहिले तर पुढच्या काळात निवडणुका घेण्याची गरज सत्ताधारी पक्षाला भासणार नाही.कारण ते मशिनद्वारे बहुमत सहजरित्या मिळवू शकतात,विरोधी पक्षाला संपविण्याचा हा भाजप सरकारचा डाव आहे.जोपर्यंत ईव्हीएम बंद होणार नाही; तोपर्यंत आमचे आंदोलन सुरू राहणार आहे; असाही इशारा रामटेके यांनी दिला आहे.
चंद्रपुरात सचिन रामटेके यांनी ईव्हीएम हटावचा नारा देत बेमुदत उपोषणाला केली सुरुवात…
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक

