- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नंदुरबार :-गावात दारूबंदीसाठी महिलांनी घेतलेला निर्णय आणि त्यांना मिळालेली गावकऱ्यांची साथ, यामुळे गावात दारूबंदीसाठी बॅलेट पेपरवर मतदान पार पडले.यामध्ये अखेर महिलांचा विजय झाला असून दारुची बाटली आडवी झाली आहे.
नंदुरबार जिल्ह्याच्या शहादा तालुक्यातील असलोद येथे दारुबंदीसाठी आज रविवारी सकाळी आठ वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली.मतदान केंद्रांवर मतदानासाठी महिलांच्या रांगा होत्या.त्यावेळी गावात मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. महसूल प्रशासन आणि पोलिस प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी मतदान प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी असलोद गावात आले होते.मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर लगेच प्रशासनाने मतमोजणीला सुरूवात केली.बॅलेट पेपरवर झालेल्या मतदानात ६७७ पैकी ६१२ महिलांनी दारुबंदीसाठी कौल दिला.त्यामुळे या गावात आता दारुबंदी होणार हे स्पष्ट झाले आहे.
एकूण १२१६ पैकी ६७७ महिलांनी मतदानाचा हक्क बजावला.त्यापैकी ६१२ महिलांनी आडवी बाटली म्हणजे दारुबंदीच्या बाजूने मतदान केले.तर ४९ महिलांनी उभी बाटली म्हणजे दारुबंदीच्या विरोधात मतदान केले.त्यानंतर मतमोजणीमध्ये दारुबंदीसाठी लढणाऱ्या महिलांचा मोठा विजय झाल्याचे स्पष्ट झाले आहे.दारुबंदीच्या बाजूने महिलांनी कौल दिल्याने गावकऱ्यांनी एकच जल्लोष केला.
- Advertisement -

