Monday, September 7, 2026
Homeभंडाराघरातील रोजच्या किटकिट पायी १८ वर्षीय विद्यार्थिनीने कीटकनाशक पिऊन केली आत्महत्या..

घरातील रोजच्या किटकिट पायी १८ वर्षीय विद्यार्थिनीने कीटकनाशक पिऊन केली आत्महत्या..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-आई-वडिलांमध्ये घरी रोजची होणारी भांडणे आणि कौटुंबिक कलहामुळे तणावात असलेल्या १८ वर्षीय विद्यार्थिनीने विषारी कीटकनाशक पिऊन आत्महत्या केली असल्याची घटना लाखनी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पोहरा गावात घडली.सुहानी इलापते वय १८ वर्षे असे तरुणीचे नाव आहे.ती बी.ए.च्या प्रथम वर्षाची विद्यार्थिनी होती.
मिळालेल्या माहितीनुसार,सुहानीच्या कुटुंबात आई-वडील,एक बहीण आणि एक भाऊ आहे.कौटुंबिक परिस्थिती आणि घरातील रोजची भांडणे यामुळे सुहानी तणावाखाली राहू लागली.दरम्यान,१७ ऑक्टोंबर रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास ती शेतात गेली आणि दुपारी २ वाजता घरी परतली.तिचे वडील खाटेवर आराम करीत होते.वडिलांशी बोलत असतानाच तिला उलट्या होऊ लागल्या.जीवन संपवण्याच्या उद्देशानेच तिने टोकाचे पाऊल उचलले असून शेतातच विषारी कीटकनाशक प्राशन केल्याची माहिती पुढे आली आहे.घरी आल्यानंतर तिची प्रकृती खालावल्याने आजूबाजूच्या लोकांनी तिला शासकीय रुग्णालयात नेले असता,उपचारादरम्यान मृत्यू झाला.
या संदर्भात सुहानीचे वडील रवींद्र इलापते वय ४४ वर्षे यांच्या तोंडी तक्रारीवरून आणि हॉस्पिटलने दिलेल्या मेमोच्या आधारे लाखनी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

माजी सरपंचांनाच प्रशासक म्हणून कायम ठेवण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील सुमारे १४ हजार २३४ ग्रामपंचायतींवर तत्कालीन सरपंच हे प्रशासक म्हणून नेमण्यात आले होते.अश्यातच माजी सरपंचांच्या सहा महिन्यांच्या काही प्रशासक पदाची...

नागपुरातील ऐतिहासिक ‘मारबत महोत्सव’ आजपासून सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरच्या सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य घटक असलेला ऐतिहासिक 'मारबत महोत्सव' आज,रविवार ६ सप्टेंबरपासून सुरू झाला.या वर्षीचा महोत्सव हा १४५...

‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद-२०२७’.. गडचिरोली जिल्ह्यातील युवकांना पंतप्रधानांसमोर नेतृत्वगुण,नवकल्पना मांडण्याची संधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याच्या संकल्पनेत युवाशक्तीचा सक्रिय सहभाग वाढविण्यासाठी ‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद -२०२७’ या राष्ट्रीय उपक्रमाला ‘विकसित...

पोलीस अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून एएसआयची आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  नवी मुंबई :-काही दिवसांपासून राज्यातील महाराष्ट्र पोलीस प्रशासनात खळबळ उडवून देणाऱ्या घटना उघडकीस येऊ लागल्या आहेत.मागील महिन्याच्या १६ ऑगस्टला नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयातील...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!