- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
कुरखेडा(गडचिरोली):-केंद्र शासनाने ग्रामीण भागातील लोकांना रोजगाराची हमी देणाऱ्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या नावात तसेच योजनेत बदल केल्याने कोट्यवधी ग्रामीण कष्टकरी मजूरांच्या रोजगारावर संकट निर्माण झाले आहे.रोजगार हमी योजनेला कायद्याचे स्वरूप प्राप्त असतांनाच केंद्राने त्यात बदल करून कायदाच मोडीत काढला आणि रोजगाराच्या हमीवर गदा आणली.यामुळे केंद्र शासनाच्या निर्णयाविरोधात आज,शुक्रवार १३ फेब्रुवारीला कुरखेडा शहराच्या फव्वारा चौकात तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने निदर्शने व निषेध करीत तीव्र विरोध दर्शविण्यात आला.
भाजप शासनाच्या या जनविरोधी,शेतकरी,मजूर विरोधी निर्णयाचा निषेध करतांना कांग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने मोठी घोषणाबाजी करीत तीव्र शब्दात निषेध करण्यात आला व मनरेगा म्हणजेच रोजगार हमी योजना पूर्व स्वरूपातच देशात लागू ठेवत ग्रामीण जनतेला हक्काचा रोजगार उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली.महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना २००५ कायदा अंमलात आणला गेला, तेव्हापासून कोट्यवधी ग्रामीण भागातील लोकांना रोजगाराची हमी देण्यात आली.मात्र,सध्याच्या सरकारने रोजगाराची हमी न देता केवळ पोकळ आश्वासने देण्याचा फंडा चालवला असल्याचे दिसून येत आहे.यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र विरोध दर्शविण्यात येत आहे.आजच्या निषेध आंदोलनात कुरखेडा कांग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष जिवन पाटील नाट,जिल्हा उपाध्यक्ष जयंत हरडे,माजी जि.प.सदस्य प्रभाकर तूलावी,माजी सभापती गिरीधर तितराम, महिला कांग्रेस तालुका अध्यक्ष आशा तूलावी, नगरसेविका हेमलता नंदेश्वर,कूंदा तितिरमारे,आशा कूमरे,जयश्री धाबेकर,संध्या नैताम,आनंदराव जांभूळकर,तूकाराम मारगाये,दामोधर वट्टी,संजय कोकोडे,राजू बावनथडे, धरमदास उईके,उस्मान खान,भावेश मुंगणकर,युवक काँग्रेस अध्यक्ष प्राजंल धाबेकर,निलकंठ कोराम,चिरकूटा नैताम,हेमंत नरोटे,भिमराव टेंभुर्णे,मयुर टेंभुर्णे,सरपंच मंजूळा मारगाये,मूखरू टेकाम,उद्धव कापगते,निलकंठ आलाम,दादाजी आळे,अखरसिंग खडाधार,हेमंत नाकाडे, संदेश कोटागंले,प्रकाश सरदार,पूष्पलता सोरते,संगीता मडावी,शशीकला कूमरे तसेच मोठ्या संख्येने कांग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.
- Advertisement -

