- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-एखाद्या राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण होऊन तो कार्यान्वित झाला नसेल,तर त्या पूर्ण भागाचा टोल घेता येणार नाही.फक्त पूर्ण झालेल्या भागासाठीच टोल आकारला जाणार आहे.याबाबत येत्या,रविवार १५ फेब्रुवारीपासून नवा नियम लागू होणार आहे.विशेष म्हणजे,केंद्र सरकारने राष्ट्रीय महामार्ग शुल्क(दरनिर्धारण व वसुली)नियम-२००८ मध्ये महत्त्वपूर्ण दुरुस्ती जाहीर केली आहे.सध्याच्या नियमांनुसार,मार्ग प्रवेश-नियंत्रित,वेगवान आणि अखंड प्रवासाची सुविधा पुरविण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय द्रुतगती महामार्गावर टोल दर हा सामान्य राष्ट्रीय महामार्गाच्या तुलनेत सुमारे २५ टक्के अधिक आकारला जातो.अश्यातच अनेक प्रकल्प टप्प्याटप्याने सुरू असतांनाच व काही द्रुतगती मार्ग पूर्णपणे सुरू नसतांनाही झालेल्या भागावर २५ टक्के जादा शुल्क आकारले जात होते.यावर प्रवाशांसह संबंधित क्षेत्राकडून नाराजी व्यक्त केली जात होती.नव्या दुरुस्तीनुसार द्रुतगती मार्ग पूर्णपणे सुरू नसल्यास,फक्त सुरू असलेल्या भागासाठी राष्ट्रीय महामार्गाच्या दराप्रमाणेच टोल आकारला जाणार आहे.त्यामुळे अतिरिक्त २५ टक्के आकारणी आता होणार नाही.
- Advertisement -

