Tuesday, August 25, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तशहरांसह ग्रामीण भागही उष्णतेच्या विळख्यात.. - काळे रस्ते अन् सिमेंट-काँक्रिटच्या रस्त्यांनी नैसर्गिक...

शहरांसह ग्रामीण भागही उष्णतेच्या विळख्यात.. – काळे रस्ते अन् सिमेंट-काँक्रिटच्या रस्त्यांनी नैसर्गिक ओलावा नष्ट..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-दिवसेंदिवस उष्णतेत भर पडत आहे. उष्णतेत वाढ कां होतेय याचा कधी कुणी विचार केला काय? पूर्वी “झाडे लावा झाडे जगवा” असे म्हटले जायचे, पण आता “झाडे तोडा अन् फॅशनेबल राहा” अशी स्थिती निर्माण झाली आहे.घर बांधकामापासून ते रस्ते बांधकाम व विविध बांधकामांनी वृक्षांचा नायनाट करणे सुरू आहे. त्यातच,शहरी भागातील डांबरापासून बनलेले काळे रस्ते आणि खुली पार्किंगची स्थळे सूर्याची उष्णता वेगाने शोषून घेतात.गडद रंगाची छते दिवसभर सौर ऊर्जा शोषून घेतात आणि ती आतच रोखून ठेवतात.
सिमेंट-काँक्रिटच्या उंच-उंच इमारती गरम हवेचा प्रवाह रोखतात,ज्यामुळे रात्रीही उष्ण राहतात.कारखाने,गाड्या, एसीमधून सतत निघणारी कृत्रिम उष्णता वातावरणाला आणखी तापवते.हल्ली ग्रामीण भागातही हीच अवस्था दिसून येत आहे.पूर्वी रस्ते मूळ जमिनीची धुळीने माखलेली असायची,मात्र आता गावातील रस्त्यांना सिमेंट काँक्रिटचा जोड देण्यात येऊ लागला आहे.काँक्रिट आणि सिमेंटमुळे पाणी जमिनीच्या आत जाऊ शकत नाही, ज्यामुळे पृष्ठभागाचा नैसर्गिक ओलावा नष्ट होतो.यामुळे
कोरडेपणा येऊन उष्णता वाढवतो.रात्री गारवा न मिळाल्याने शरीराचे अंतर्गत तापमान संतुलित होत नाही.वृद्ध व हृदयरोगाच्या रुग्णांमध्ये हार्ट अटॅक, स्ट्रोकचा धोका जास्त असतो.रात्रीच्या उष्णतेमुळे वनस्पती आपली ऊर्जा साठवण्याऐवजी ‘श्वसनात’ खर्च करतात.त्यामुळे पिकांचे दाणे लहान राहतात आणि उत्पादनात घट होते.पारा ३० अंशांच्या वर राहिल्याने गाढ झोप लागत नाही,ज्यामुळे थकवा आणि चिडचिडेपणा वाढतो.थंड करणारी उपकरणे चोवीस तास सुरू राहिल्याने विजेची मागणी सर्वोच्च स्तरावर राहते.ट्रान्सफॉर्मर थंड होऊ शकत नाहीत.ग्रीड फेल होण्याचा धोका वाढतो आहे.पुढील काळात उष्णतेचे काही खरे नाही.सध्या स्थितीत उष्माघाताचा आठ राज्यांना फटका बसू लागला आहे.यात महाराष्ट्र राज्यातील विशेषतः विदर्भ व पूर्व भाग,उत्तर प्रदेशातील मध्य व पश्चिम भाग,मध्य प्रदेशातील पूर्व आणि मध्य भाग,राजस्थानातील पूर्व भाग,ओडिशातील पश्चिम व अंतर्गत भाग,झारखंड राज्यातील पश्चिम भाग, तेलंगणातील जवळपास संपूर्ण राज्य तर आंध्रातील उत्तर किनारपट्टी व अंतर्गत भाग तीव्र उष्णेतेने होरपळला जातो आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अंगावर भिंत कोसळून चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातून आज,सोमवार २४ ऑगस्ट रोजी एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे.अर्जुनी मोरगाव तालुक्यातील खामखुरा गावात घरासमोरील अंगणात...

माता व बालक मृत्यू प्रकरणी चौकशी समिती गठीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या चामोर्शी येथील प्रसूती प्रकरणात माता व बालकाच्या मृत्यूची सखोल व निष्पक्ष चौकशी करण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक स्तरावर चौकशी समिती गठीत करण्यात...

देसाईगंज आदर्श महाविद्यालयात वाणिज्य विद्यार्थी अभ्यास मंडळाची स्थापना.. – विद्यार्थ्यांनी आत्मनिर्भर बनावे- प्रा.डॉ.निलेश हलामी

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आदर्श कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय देसाईगंज येथे महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डाॅ.श्रीराम गहाणे यांच्या मार्गदर्शनात शैक्षणिक सत्र २०२६-२७ करिता वाणिज्य विद्यार्थी अभ्यास मंडळाची स्थापना...

धावत्या बसमधून खाली कोसळताच दुसऱ्या बसने चिरडले; तरुणीचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-पुण्यातील सिंहगड मार्गावरील माणिकबाग परिसरात आज,सोमवार २४ ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास भीषण अपघाताची घटना घडली. खानापूर-स्वारगेट मार्गावरील धावत्या पुणे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!