- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-वाघांच्या शिकारीसाठी कुख्यात असणाऱ्या बहेलिया टोळीचा म्होरक्या अजित राजगोंड याला २७ जानेवारीला चंद्रपूर जिल्ह्याच्या राजुरा तालुक्यातून अटक करण्यात आली होती.बहेलिया टोळी ही मध्य प्रदेशातील टोळी आहे.अजित राजगोंड हा टोळीचा म्होरक्या असून टोळीतील आणखी चार महिलांना अटक करण्यात आली आहे.त्यानुसार आता कुख्यात वाघ तस्कर अजित राजगोंड आणि त्याच्यासोबत असलेल्या चार महिलांची वनकोठडी जेएमएफसी राजुरा न्यायालयाने ७ फेब्रुवारीपर्यत वाढवली आहे.या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पर्यावरण मंत्रालय,वन आणि हवामान बदल विभाग आणि राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने (एनटीसीए) नियुक्त केलेल्या विशेष कार्य दलाचे (एसटीएफ) एक पथक चंद्रपुरात तर दुसरे पथक मध्य प्रदेशातील कटनी येथे दाखल झाले आहे.तपासात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.मेघालयच्या शिलाँगमधून अटक करण्यात आलेला माजी सैनिक लालनेईसंग आणि अजित राजगोंड यांच्यात सुमारे २० लाख रुपयांचा आर्थिक व्यवहार झाल्याचे निष्पन्न झाले आहे.या व्यवहारांतर्गत किमान ९ ते १० वाघांचे अवयव पाठवण्यात आल्याची शंका आहे.लालनेईसंगने हे अवयव चीन आणि थायलंडमध्ये पुरवल्याचीही माहिती समोर येत आहे.अजित राजगोंडचा गुन्हेगारी इतिहास गंभीर आहे.२०१५ मध्ये त्याला तिरुपती येथून अटक करण्यात आली होती आणि सीबीआयने त्याला शिक्षाही सुनावली होती.सप्टेंबर २०२३ मध्ये तो जामिनावर सुटला होता.२०१३-१४ मध्ये मेळघाट येथे २० ते २५ वाघांच्या हत्येत त्याचा सहभाग असल्याचा संशय आहे.
- Advertisement -

