Monday, May 25, 2026
Homeचंद्रपूरआजीचे कानतोड्या नातवाला २ वर्षे कारावास - आजीच्या कानात होती; सोन्याची बिरी...

आजीचे कानतोड्या नातवाला २ वर्षे कारावास – आजीच्या कानात होती; सोन्याची बिरी…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

चंद्रपूर :- दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून नातवाने चक्क आजीचा कानच तोडल्याची घटना दोन वर्षभरापूर्वी गोंडपिपरी तालुक्यातील राळेगावात घडली होती.याप्रकरणी गोंडपिपरी तालुका न्यायालयाने बुधवारी निकाल देत नातवाला दोन वर्षांची शिक्षा व पाच हजारांचा दंड ठोठावला.राहुल देठे असे आरोपी नातवाचे नाव आहे.राहुलला दारूचे व्यसन आहे.आधीच दारू पिऊन असताना पुन्हा त्याला दारू पिण्याची तलब आली.पण खिशात पैसे नव्हते.अशावेळी तो आपली आजी बुधाबाई रायपुरे ८० यांच्या घरी गेला.दारूसाठी पैशांची मागणी केली, पण पैसे देण्यास आजीने नकार दिला.त्याला आजीच्या कानात सोन्याची बिरी दिसली. त्याने जबरदस्तीने आजीच्या कानातील सोन्याची बिरी खेचून पळ काढला.या घटनेत आजीचा कानच तुटला व गंभीर जखमी झाली. याप्रकरणी आजीने गोंडपिपरी पोलिस ठाण्यात तक्रार केली.पोलिसांनी कलम ३२७ अन्वये त्याच्यावर गुन्हा दाखल केला.ठाणेदार जीवन राजगुरू यांच्या नेतृत्वात साहाय्यक पोलिस उपनिरीक्षक वसंत कोसनशिले यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले.न्यायाधीशांनी पुरावे तपासून आरोपी राहुलला दोन वर्षांची शिक्षा व पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला.सरकारी वकील म्हणून ॲड.राजेश धात्रक यांनी कामकाज सांभाळले.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नागरिकांनी लोकशाही दिनात तक्रारी व निवेदने सादर करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन  येत्या,सोमवार १ जून २०२६ रोजी दुपारी ३ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येथील सभागृहात करण्यात आले आहे.जिल्ह्यातील नागरिकांनी...

देशात जनगणनेची प्रक्रिया सुरू झाली; पण ओबीसी समाजासाठी स्वतंत्र रकानाच नाही.. देसाईगंज तालुका ओबीसी समाज संघटनेच्या वतीने उपविभागीय कार्यालयावर धडकणार ‘भव्य मोर्चा’..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):- "आमची संख्या,आमचा हक्क,आमचा सन्मान!" आणि "जनगणनेत स्वतंत्र कॉलम,आमचा हक्क!" अशी गगनभेदी गर्जना करत देसाईगंज तालुका ओबीसी समाज संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात...

रोजगार हमी योजनेच्या कायद्याची जागा घेणाऱ्या ‘व्हीबी-जी राम जी’ योजनेत १२५ दिवस काम देण्याची हमी..

उद्रेक न्युज वृत्त :-बऱ्याच कालावधीपासून सुरू असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना-२००५ कायद्याची जागा आता 'विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजिविका...

सामान्य माणसाचा जीव २५ लाखांचा ठरवत असाल तर तुम्ही स्वतः वाघासमोर उभे राहा; आम्हीही तुम्हाला २५ लाख देतो..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-नुकतेच चंद्रपूर जिल्ह्याच्या सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही परिसरात वाघाच्या हल्ल्यात चार महिलांचा मृत्यू झाला.या घटनेने सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे.या पार्श्वभूमीवर सामाजिक...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!