Tuesday, June 23, 2026
Homeनागपूरकर्मचारी भरतीवरील बंदी;अनुकंपा नियुक्त्यांना लागू होत नाही...- मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने...

कर्मचारी भरतीवरील बंदी;अनुकंपा नियुक्त्यांना लागू होत नाही…- मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला निर्णय..- कर्मचारी वडिलाचा सेवेदरम्यान झाला होता मृत्यू …

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

नागपूर :- कर्मचारी भरतीवरील बंदीचा निर्णय अनुकंपा तत्त्वावरील नियुक्त्यांना लागू होत नाही; असे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणावरील निर्णयात स्पष्ट केले आहे.तसेच या प्रकरणातील दिवंगत कर्मचाऱ्याच्या मुलाला अनुकंपा तत्त्वावर देण्यात आलेली नोकरी कायदेशीर ठरविली आहे.न्यायमूर्तिद्वय रोहित देव व यानशिवराज खोब्रागडे यांनी हा निर्णय दिला आहे.

विकास कामडी असे मुलाचे नाव असून ते नगरधन, तालुका-रामटेक येथील रहिवासी आहेत.त्यांचे वडील सुखदास नगरधन मधील इंदिरा गांधी विद्यालयात प्रयोगशाळा सहायक होते.१७ जुलै २०१२ रोजी त्यांचा सेवेदरम्यान मृत्यू झाला.त्यामुळे विकास यांनी जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडे अनुकंपा नोकरीसाठी अर्ज केला होता.शिक्षणाधिकाऱ्यांनी २० जानेवारी २०१५ रोजी त्यांची शिपाईपदी नियुक्ती करण्याला मान्यता दिली; परंतु,शिक्षण उपसंचालकांनी ८ ऑगस्ट २०१८ रोजीच्या वादग्रस्त आदेशाद्वारे ती मान्यता रद्द केली होती.२ मे २०१२ रोजीच्या शासन निर्णयाद्वारे कर्मचारी भरतीवर बंदी आणल्या गेली होती.त्यामुळे ही नियुक्ती केली जाऊ शकत नाही; असे कारण वादग्रस्त आदेशात देण्यात आले होते.त्याविरुद्ध विकास यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली असता कर्मचारी भरतीवरील बंदीचा निर्णय अनुकंपा तत्त्वावरील नियुक्त्यांना लागू होत नाही; असा निर्णय देण्यात आला.याशिवाय,विकास यांच्या थकीत वेतन व इतर आर्थिक लाभाच्या बिलांना नियमानुसार मंजुरी द्या; असेही निर्देशही न्यायालयाने सरकारला दिले.विकास यांच्यातर्फे ॲड.संतोष चांडे यांनी बाजू मांडली.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कृषी कार्याची राज्य शासनाकडून दखल.. – तीन प्रगतशील शेतकऱ्यांना ‘वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार’ जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील तीन प्रगतशील शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कृषी कार्याची राज्य शासनाने दखल घेत सन २०२३-२४ व २०२४-२५ या वर्षांसाठीचा प्रतिष्ठेचा 'वसंतराव नाईक शेतीनिष्ठ...

कर्जमाफीसाठी शेतकरी थेट बैलावर बसून पोहचला तहसील कार्यालयात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-राज्यातील शेतकरी बांधवांचे २ लाखापर्यंत कर्जमाफ करण्यात येणार आहे; पण शेतकऱ्यांना अद्यापही कर्जमाफी योजनेचा लाभ मिळालेला नाही. कर्जमाफीबाबत प्रशासनाकडून वा संबंधित...

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-एसटी अर्थात राज्य परिवहन महामंडळाच्या  कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे ५३ टक्क्यांवरून ५८ टक्क्यांपर्यंत वाढविण्याची घोषणा आज,मंगळवार २३ जून रोजी...

नोंदणीकृत सर्व वृत्तपत्र व नियतकालिक प्रकाशकांनी निर्धारित मुदतीत वार्षिक विवरणपत्र सादर करण्याचे आवाहन.. – अन्यथा दहा हजाराचा दंड..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-प्रेस अँड रजिस्ट्रेशन ऑफ पिरिऑडिकल्स (पीआरपी)अधिनियम,२०२३ अंतर्गत नोंदणीकृत सर्व वृत्तपत्र व नियतकालिक प्रकाशकांनी आर्थिक वर्ष २०२४-२५ चे लेखापरीक्षित वार्षिक विवरणपत्र प्रेस...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!