Friday, May 1, 2026
Homeनागपूरकर्मचारी भरतीवरील बंदी;अनुकंपा नियुक्त्यांना लागू होत नाही...- मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने...

कर्मचारी भरतीवरील बंदी;अनुकंपा नियुक्त्यांना लागू होत नाही…- मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला निर्णय..- कर्मचारी वडिलाचा सेवेदरम्यान झाला होता मृत्यू …

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

नागपूर :- कर्मचारी भरतीवरील बंदीचा निर्णय अनुकंपा तत्त्वावरील नियुक्त्यांना लागू होत नाही; असे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणावरील निर्णयात स्पष्ट केले आहे.तसेच या प्रकरणातील दिवंगत कर्मचाऱ्याच्या मुलाला अनुकंपा तत्त्वावर देण्यात आलेली नोकरी कायदेशीर ठरविली आहे.न्यायमूर्तिद्वय रोहित देव व यानशिवराज खोब्रागडे यांनी हा निर्णय दिला आहे.

विकास कामडी असे मुलाचे नाव असून ते नगरधन, तालुका-रामटेक येथील रहिवासी आहेत.त्यांचे वडील सुखदास नगरधन मधील इंदिरा गांधी विद्यालयात प्रयोगशाळा सहायक होते.१७ जुलै २०१२ रोजी त्यांचा सेवेदरम्यान मृत्यू झाला.त्यामुळे विकास यांनी जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडे अनुकंपा नोकरीसाठी अर्ज केला होता.शिक्षणाधिकाऱ्यांनी २० जानेवारी २०१५ रोजी त्यांची शिपाईपदी नियुक्ती करण्याला मान्यता दिली; परंतु,शिक्षण उपसंचालकांनी ८ ऑगस्ट २०१८ रोजीच्या वादग्रस्त आदेशाद्वारे ती मान्यता रद्द केली होती.२ मे २०१२ रोजीच्या शासन निर्णयाद्वारे कर्मचारी भरतीवर बंदी आणल्या गेली होती.त्यामुळे ही नियुक्ती केली जाऊ शकत नाही; असे कारण वादग्रस्त आदेशात देण्यात आले होते.त्याविरुद्ध विकास यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली असता कर्मचारी भरतीवरील बंदीचा निर्णय अनुकंपा तत्त्वावरील नियुक्त्यांना लागू होत नाही; असा निर्णय देण्यात आला.याशिवाय,विकास यांच्या थकीत वेतन व इतर आर्थिक लाभाच्या बिलांना नियमानुसार मंजुरी द्या; असेही निर्देशही न्यायालयाने सरकारला दिले.विकास यांच्यातर्फे ॲड.संतोष चांडे यांनी बाजू मांडली.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

महाराष्ट्र राज्याचा ६७ वा स्थापना दिन उत्साहात साजरा.. महाराष्ट्र दिनी “समृद्ध गडचिरोली” घडविण्याचा संकल्प..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र राज्याच्या ६७ व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांनी “समृद्ध गडचिरोली” घडवण्याचा संकल्प व्यक्त करत विकास, शांतता...

‘आदिशा’ प्रकल्पांतर्गत महिला बचत गटातील लाभार्थ्यांना मिळणार दोन टक्के व्याजदराने १ लाख रुपये..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महिला बचत गटांना केवळ २ टक्के व्याजदराने फिरता निधी उपलब्ध करून देत गावपातळीवर आर्थिक साखळी निर्माण करणारा ‘आदिशा’ प्रकल्प जिल्ह्याच्या विकासात...

चक्क चोरट्यांनी खासदारांच्या शेतातील वीज मीटरसह मोटरपंप नेला चोरून.

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्यात चोरीच्या घटनांनी जोर धरलेला असतांनाच आता थेट लोकप्रतिनिधीही यातून सुटलेले नाहीत.भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ.प्रशांत पडोळे यांच्या वडिलोपार्जित शेतातून अज्ञात...

तब्बल २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; चंद्रपूर पोलिस अधीक्षक पदाची सूत्रे आता आयुष नोपानी यांच्याकडे..

उद्रेक न्युज वृत्त :-ऐन महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच आज,गुरुवार ३० एप्रिल रोजी राज्यातील तब्बल २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या(भारतीय पोलीस सेवा)बदल्या करण्यात आल्या आहेत.यात चंद्रपूरचे विद्यमान...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!