उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :- ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाबाहेर वाघांची संख्या झपाट्याने वाढत आहे.त्यामुळे वाघ कधी आणि कुठे दिसणार,हे सांगणे कठीण झाले आहे. वाघाचे नाव ऐकताच ग्रामस्थांचा थरकाप उडतो आणि तो अचानक समोर आला तर भीतीने बोलतीही बंद होते.असाच प्रकार नागभीड तालुक्यात उघडकीस आला.गोविंदपूर रस्त्यावर मंगरुडजवळ एका शेतकऱ्यासमोर अचानक वाघ उभा येऊन ठाकला. त्यामुळे शेतकऱ्याची बोबडी वळली.मात्र,त्याच वेळी तिथे एसटी महामंडळाची बस आली.बसचालक या शेतकऱ्यासाठी देवदूतच ठरला.चालकाने प्रसंगावधान राखत शेतकऱ्याला बसमध्ये घेऊन त्याचे प्राण वाचविले.
पावसातच शेतकऱ्यांचे आपापल्या शेतातील रोवणी आटोपण्याकडे लक्ष लागले आहे.पावसातही शेतकरी शेतावर जावून रोवणीची तयारी करीत आहेत. मंगळवारी गोविंदपूर येथील रामदास खानदेवे हा शेतकरी मांगरूड शिवारातील शेतावर सायकलने आले होते.शेतावरील काम आटोपल्यानंतर सायंकाळी साडेपाचच्या सुमारास शेतकरी आपल्या गोंविंदपूर या गावी सायकलने जायला निघाला.मांगरूड ते गोविंदपूर या मार्गाने नहराच्या समोरील
नागमोडी वळणावर जाणार इतक्यातच अचानक वाघोबा जंगलातून रस्त्यावर आला.दोघेही एकमेकासमोर उभे ठाकले.प्रत्यक्ष वाघोबाच समोर उभा असल्याने शेतकरी निःस्तबध्द झाला.जीवाचे काहीबरेवाईट होईल तेवढ्यातच मांगरूड वरून गोविंदपूरकडे जाणारी एसटी बस आली.वाघ आणि शेतकरी दोघेही एकमोसमारे उभे असल्याचा थरारक प्रसंग त्यांनी बघितला. Lलगेच चालकाने एसटी थांबविली.शेतकऱ्याला वाचविण्यासाठी पुढाकार घेतला.क्षणाचाही विलंब न करता शेतकऱ्याला एसटी बसमध्ये बसविण्यात आले.’वेळ आली होती पण, काळ आला नव्हता’ त्यामुळे शेतकऱ्याचा जीव वाचला.एसटी बस गोविंदपूर गावात पोहचली आणि त्या शेतकऱ्याला गावात सोडण्यात आले.

