Thursday, April 30, 2026
Homeचंद्रपूरअन् वाघ त्याच्याकडे… अन् 'तो' वाघाकडे बघतच राहिला..!-झटक्यात वळली बोबडी…

अन् वाघ त्याच्याकडे… अन् ‘तो’ वाघाकडे बघतच राहिला..!-झटक्यात वळली बोबडी…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

चंद्रपूर :- ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाबाहेर वाघांची संख्या झपाट्याने वाढत आहे.त्यामुळे वाघ कधी आणि कुठे दिसणार,हे सांगणे कठीण झाले आहे. वाघाचे नाव ऐकताच ग्रामस्थांचा थरकाप उडतो आणि तो अचानक समोर आला तर भीतीने बोलतीही बंद होते.असाच प्रकार नागभीड तालुक्यात उघडकीस आला.गोविंदपूर रस्त्यावर मंगरुडजवळ एका शेतकऱ्यासमोर अचानक वाघ उभा येऊन ठाकला. त्यामुळे शेतकऱ्याची बोबडी वळली.मात्र,त्याच वेळी तिथे एसटी महामंडळाची बस आली.बसचालक या शेतकऱ्यासाठी देवदूतच ठरला.चालकाने प्रसंगावधान राखत शेतकऱ्याला बसमध्ये घेऊन त्याचे प्राण वाचविले.

पावसातच शेतकऱ्यांचे आपापल्या शेतातील रोवणी आटोपण्याकडे लक्ष लागले आहे.पावसातही शेतकरी शेतावर जावून रोवणीची तयारी करीत आहेत. मंगळवारी गोविंदपूर येथील रामदास खानदेवे हा शेतकरी मांगरूड शिवारातील शेतावर सायकलने आले होते.शेतावरील काम आटोपल्यानंतर सायंकाळी साडेपाचच्या सुमारास शेतकरी आपल्या गोंविंदपूर या गावी सायकलने जायला निघाला.मांगरूड ते गोविंदपूर या मार्गाने नहराच्या समोरील

नागमोडी वळणावर जाणार इतक्यातच अचानक वाघोबा जंगलातून रस्त्यावर आला.दोघेही एकमेकासमोर उभे ठाकले.प्रत्यक्ष वाघोबाच समोर उभा असल्याने शेतकरी निःस्तबध्द झाला.जीवाचे काहीबरेवाईट होईल तेवढ्यातच मांगरूड वरून गोविंदपूरकडे जाणारी एसटी बस आली.वाघ आणि शेतकरी दोघेही एकमोसमारे उभे असल्याचा थरारक प्रसंग त्यांनी बघितला. Lलगेच चालकाने एसटी थांबविली.शेतकऱ्याला वाचविण्यासाठी पुढाकार घेतला.क्षणाचाही विलंब न करता शेतकऱ्याला एसटी बसमध्ये बसविण्यात आले.’वेळ आली होती पण, काळ आला नव्हता’ त्यामुळे शेतकऱ्याचा जीव वाचला.एसटी बस गोविंदपूर गावात पोहचली आणि त्या शेतकऱ्याला गावात सोडण्यात आले.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अखेर कुरखेडा नगरपंचायत सफाई कामगारांच्या बेमुदत संपावर तोडगा; संप मागे..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा नगरपंचायत अंतर्गत कार्यरत सफाई कामगारांंनी थकीत वेतनाकरीता मागील २३ एप्रीलपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले होते.त्यामुळे शहरातील स्वच्छतेचा गंभीर प्रश्न निर्माण...

कायदा हा लवचिक आणि बदलत्या काळाशी सुसंगत असावा- सर्वोच्च न्यायालय – गर्भपाताची परवानगी दिली नाही; तर पीडितेच्या मनावर आयुष्यभर न पुसली जाणारी जखम आणि...

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच २४ एप्रिल २०२६ रोजी न्यायमूर्ती बी.व्ही.नागरत्ना आणि न्यायमूर्ती उज्ज्वल भुयान यांच्या खंडपीठाने एका १५ वर्षीय बलात्कार पिडीत तरुणीला ३० आठवड्यांचा...

बच्चू कडूंनी धनुष्यबाण घेतला हाती; शेतकरी,मजूर,दिव्यांगांसाठी निर्णय..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-दिव्यांग,शेतकरी आणि गोरगरिबांसाठी लढणारा 'रॉबिनहूड' नेता माजी मंत्री तथा प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी आज,गुरुवार ३० एप्रिल रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री...

शहरी भागात क्युआर कोड असलेली विवाह प्रमाणपत्रे द्या.. – देसाईगंज भाजप पदाधिकाऱ्यांची मागणी..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-डिजिटल इंडिया मोहिमेअंतर्गत सध्या स्थितीत अनेक शासकीय कागदपत्रे ऑनलाइन आणि सुरक्षित केली जात आहेत.यात विवाह नोंदणी प्रमाणपत्राचाही समावेश आहे.विवाह नोंदणी प्रमाणपत्राला विशेष...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!