Tuesday, June 23, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोली जिल्ह्यातील रेल्वेचा प्रश्न खासदार नामदेव किरसान यांनी संसदेत केला उपस्थित…

गडचिरोली जिल्ह्यातील रेल्वेचा प्रश्न खासदार नामदेव किरसान यांनी संसदेत केला उपस्थित…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली:-मागील अनेक वर्षांपासून गडचिरोली जिल्ह्यातील रेल्वेचा प्रश्न प्रलंबित आहे.प्रत्यक्षात रेल्वेचे काम संथगतीने सुरू आहे.त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.वडसा-गडचिरोली रेल्वे मार्गाचे काम जलदगतीने करावे व बंद असलेल्या रेल्वेगाड्या चालू करण्याची मागणी गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी लोकसभेत केली. कोरोनाकाळापासून बलारशहा-वडसा-गोंदिया मार्गावरील काही ट्रेन बंद आहेत.त्यामुळे या मार्गांवर आवागमन करणाऱ्या प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.तर दुसरीकडे सिरोंचा,अहेरी भागातील रस्ते खराब असल्याने व नागपूरचा प्रवास या मार्गाने लांब होत असल्याने या भागातील नागरिक काजीपेठ मार्गे,काजीपेठ अजनी पॅसेंजर ट्रेनने प्रवास करीत होते.मात्र,ती ट्रेनसुद्धा कोरोनाकाळात बंद केल्यापासून अद्याप सुरू केली नाही.अहेरी-सिरोंचा परिसरातील नागरिकांना आवागमनाकरिता त्रास होत असून,वडसा ते चांदा फोर्ट,चांदाफोर्ट ते गोंदिया,गोंदिया ते रायपूर,काजीपेठ ते अजनी (नागपूर) या गाड्या कोरोनाकाळापासून बंद आहेत. त्या गाड्या पूर्ववत सुरू करण्यात याव्यात.गडचिरोली-वडसा,नागभीड-नागपूर रेल्वेचे काम जलदगतीने पूर्ण करण्यात यावे.वडसा आणि अन्य महत्वाच्या ठिकाणी जिथे रेल्वेच्या खाली भुयारी मार्ग तयार करण्यात आले आहेत.तिथे तुडुंब पाणी भरत असल्याने लोकांना प्रवासाकरिता अडचण निर्माण होत आहे.अशा ठिकाणी प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी खा.डॉ.नामदेव किरसान यांनी पावसाळी अधिवेशनादरम्यान रेल्वेमंत्री वैष्णव यांच्याकडे केली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कृषी कार्याची राज्य शासनाकडून दखल.. – तीन प्रगतशील शेतकऱ्यांना ‘वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार’ जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील तीन प्रगतशील शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कृषी कार्याची राज्य शासनाने दखल घेत सन २०२३-२४ व २०२४-२५ या वर्षांसाठीचा प्रतिष्ठेचा 'वसंतराव नाईक शेतीनिष्ठ...

कर्जमाफीसाठी शेतकरी थेट बैलावर बसून पोहचला तहसील कार्यालयात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-राज्यातील शेतकरी बांधवांचे २ लाखापर्यंत कर्जमाफ करण्यात येणार आहे; पण शेतकऱ्यांना अद्यापही कर्जमाफी योजनेचा लाभ मिळालेला नाही. कर्जमाफीबाबत प्रशासनाकडून वा संबंधित...

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-एसटी अर्थात राज्य परिवहन महामंडळाच्या  कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे ५३ टक्क्यांवरून ५८ टक्क्यांपर्यंत वाढविण्याची घोषणा आज,मंगळवार २३ जून रोजी...

नोंदणीकृत सर्व वृत्तपत्र व नियतकालिक प्रकाशकांनी निर्धारित मुदतीत वार्षिक विवरणपत्र सादर करण्याचे आवाहन.. – अन्यथा दहा हजाराचा दंड..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-प्रेस अँड रजिस्ट्रेशन ऑफ पिरिऑडिकल्स (पीआरपी)अधिनियम,२०२३ अंतर्गत नोंदणीकृत सर्व वृत्तपत्र व नियतकालिक प्रकाशकांनी आर्थिक वर्ष २०२४-२५ चे लेखापरीक्षित वार्षिक विवरणपत्र प्रेस...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!