Monday, December 15, 2025
Homeआरमोरी३८ वर्षीय तरुणाने घरीच घेतला गळफास.. - आरमोरी तालुक्यातील आजची घटना..

३८ वर्षीय तरुणाने घरीच घेतला गळफास.. – आरमोरी तालुक्यातील आजची घटना..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
आरमोरी(गडचिरोली):-आरमोरी तालुक्याच्या वैरागड येथील मास्तर कॉलनीमध्ये एका ३८ वर्षीय तरुणाने स्वतः च्या राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज,बुधवार दिनांक-१३ नोव्हेंबरला सकाळी साडे आठ वाजेच्या दरम्यान उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.मनीष ऊर्फ मुन्ना शंकर खोब्रागडे वय ३८ वर्षे, रा.वैरागड,ता.आरमोरी,असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,आरमोरी तालुक्याच्या वैरागड येथील मास्तर कॉलनीमध्ये मनीष खोब्रागडे कुटुंबीयांसह वास्तव्यास होता.त्यातच मनीष हा काल,मंगळवारी १२ नोव्हेंबरच्या रात्री जेवण करून घरीच झोपला होता.त्यानंतर आज सकाळी कुटुंबीय झोपेतून जागे होऊन मनीष याच्या खोलीमध्ये गेले.खोलीमध्ये बघितले असता,तो आढळून आला नाही. त्यानंतर घरच्यांनी तळ मजल्यावरील खोलीत जाऊन बघितले असता,त्यांना मनीष हा तळ मजल्यावरील खोलीच्या आड्याला नायलॉनच्या दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला.घरच्यांनी लगेच याबाबत आरमोरी पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठत घटनेचा पंचनामा करून मृतकाचे शव उपजिल्हा रुग्णालय आरमोरी येथे शविच्छेदनासाठी पाठविले.घटनेचा पुढील तपास आरमोरी पोलीस प्रशासन करीत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

रेतीच्या एका ट्रकमुळे उचलबांगडी..! ब्रम्हपुरी उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांची होणार विभागीय चौकशी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एखाद्याची उचलबांगडी करायची झाली तर अनेकजण त्या व्यक्तीच्या मागे हात धुऊन लागत असतात.नाहीतर कितीतरी तक्रारी वा प्रकरणे आजही कार्यालयात धूळ खात...

आमदार विरोधात बातमी भोवली; हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल.. चार पत्रकारांना पाच दिवसाचा कारावास..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एखादी बातमी वा वृत्त प्रसारित करतांना त्यातील तथ्य तसेच सत्यता तपासणे हे प्रत्येक पत्रकारांचे काम आहे.मात्र,काहीजण याचे उल्लंघन करून एखाद्याची नाहक...

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी.. अर्ज भरतांना किंवा ई-केवायसी करतांना झालेल्या चुका सुधारण्यासाठी संधी..

उद्रेक न्युज वृत्त :-'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना' ही राज्य सरकारची अत्यंत लोकप्रिय आणि महत्त्वाकांक्षी योजना असून या योजनेचा लाभ घेणाऱ्या बहुतांश लाभार्थी महिला या...

किती हे हल्ले म्हणावे..! वाघाने घेतला महिलेचा जीव..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्यात मानव-वन्यजीव संघर्ष दिवसेंदिवस वाढू लागला आहे.विदर्भातील एकट्या चंद्रपूर जिल्ह्यात वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात ३९ वा तर वाघाच्या हल्ल्यातील ३७ वा बळी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!