Tuesday, September 8, 2026
Homeगोंदिया'डायल ११२' वर खोटी माहिती देत असाल तर सावधान; कारावासासह दंडाची शिक्षा.....

‘डायल ११२’ वर खोटी माहिती देत असाल तर सावधान; कारावासासह दंडाची शिक्षा.. – खोटी माहिती दिल्याने तरुणावर गुन्हा दाखल..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गोंदिया :- ‘डायल ११२’ हा भारत सरकारचा आपत्कालीन हेल्पलाईन क्रमांक आहे.याद्वारे आपत्कालीन परिस्थितीत पोलिस व इतर काही महत्त्वाच्या सेवा एकाच नंबरवर जलद गतीने मिळतात. ११२ हा क्रमांक २४ तास सुरू असतो.कॉल केल्यावर काही वेळातच घटनास्थळी मदत पोहोचवली जाते.११२ नंबर डायल केल्यावर नियंत्रण कक्षाला तुमच्या फोनचे अचूक जीपीएस(GPS)लोकेशन कळते,ज्यामुळे मदत पाठवणे सोपे होते.सदरचा कॉल मोबाईल फोन वा लँडलाईनवरून. मोफत करता येतो.पण, ‘डायल ११२’ या आपत्कालीन क्रमांकावर खोटी किंवा दिशाभूल करणारी माहिती दिल्यास थेट कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल केला जातो,ज्यामध्ये दोषी व्यक्तीला एक वर्षाचा कारावास वा १० हजार रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.मात्र,काहींना याबाबत माहिती नसल्याने एखादी मस्करी करण्यासाठी वा जाणून- बुजून त्रास देण्यासाठी ‘डायल ११२’ वर खोटी व दिशाभूल करणारी माहिती देण्यात येते.अश्याच प्रकारे गोंदिया जिल्ह्याच्या नवेगावबांध येथील एका ३६ वर्षीय तरुणाने ‘डायल ११२’ वर फोन करून एकाचा खून झाल्याची माहिती दिली.मात्र,प्रत्यक्षात अशी कुठलीही घटना घडलेली नसल्याचे निष्पन्न झाल्याने अखेर तरुणावर नवेगावबांध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नंदकुमार शामराव उईके वय ३६ वर्षे,रा.माऊली मोहल्ला, नवेगावबांध, ता.अर्जुनी मोरगाव,जि.गोंदिया असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे.
तीन दिवसांपूर्वी रात्री ८ वाजून २० मिनिटांनी नवेगावबांध पोलिस ठाण्याच्या हद्दीत ‘डायल ११२’ वर एका व्यक्तीने ‘खून झालाय,लवकर या.!’ अशी माहिती दिली.देण्यात आलेली माहिती अत्यंत गंभीर स्वरूपाची असल्याने नवेगावबांध पोलिस ठाण्याचे अधिकारी व पोलिसांचा मोठा फौजफाटा घेऊन तातडीने घटनास्थळी रवाना झाले.मात्र,घटनास्थळी पोहचताच अशी कोणतीही खुनाची घटना घडलेली नसल्याचे स्पष्ट झाले.त्यानंतर करण्यात आलेल्या चौकशीत संबंधित व्यक्तीने केवळ मस्करी करण्यासाठी खोटी माहिती दिल्याचे निष्पन्न झाल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.विशेष म्हणजे,खोट्या कॉल्समुळे पोलिसांचा मौल्यवान वेळ आणि आपत्कालीन संसाधने वाया जातात,ज्यामुळे खऱ्या गरजू लोकांपर्यंत मदत पोहोचण्यास अडथळा निर्माण होतो.या घटनेमुळे आपत्कालीन सेवेचा गैरवापर करणाऱ्यांवर पोलीस प्रशासनाने कठोर कारवाईचा इशारा दिला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

ट्रक आणि पिकअप वाहनाची समोरासमोर जोरदार धडक; सहा जणांचा जागीच मृत्यू,तर सात जण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-गोंदिया-बालाघाट राष्ट्रीय महामार्गावर एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे.गोंदिया-बालाघाट मार्गावरील नागरा परिसरात एका भरधाव ट्रक आणि पिकअप वाहनाची समोरासमोर जोरदार...

शासकीय शुल्काव्यतिरिक अतिरिक्त रकमेची मागणी; केवळ १५० रुपये घेतांना सेतू केंद्र चालकाला रंगेहाथ पकडले..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-नागरिकांना वेळेत व तात्काळ शासकीय प्रमाणपत्रे मिळावीत,यासाठी ऑनलाईन सेतू केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.मात्र,काही सेतू केंद्र चालक मनमानी कारभार करून शासकीय...

गावाजवळच दर्जेदार शिक्षण; चार शाळा बनणार ‘मॉडेल शाळा’..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आदिवासीबहुल आणि दुर्गम एटापल्ली तालुक्यातील विद्यार्थ्यांना गावाजवळच आधुनिक, गुणवत्तापूर्ण आणि सर्वांगीण शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तालुक्यातील चार शाळा ‘मॉडेल शाळा’...

भरती परीक्षा सुधारणांसाठी उच्चस्तरीय टास्क फोर्स गठीत; राज्यातील सर्व सहा विभागांना देणार प्रत्यक्ष भेटी.. – थेट संवादासह आपल्या सूचना व अभिप्राय संबंधित विभागाच्या ई-मेलवर...

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यातील भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक,विश्वासार्ह व उमेदवाराभिमुख करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ४ सप्टेंबर २०२६ रोजीच्या शासन निर्णयान्वये उच्चस्तरीय टास्क फोर्स गठीत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!